Sunday, January 17, 2016

मरतुकडी गाय-उल्हास हरी जोशी,

मरतुकडी गाय
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली.
चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’
गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.
त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.
तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’
‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’
आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’
‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’
आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.
अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.
मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.
अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्‍या माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्‍याचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्‍या मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणार्‍या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्‍या मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.
नुकचीच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप’ साठी अनेक योजना जाहीर करून उद्योग व्यवसायाच्या संधीचे भले मोठे दार उघडून दिले आहे. याचा अर्थ अनेकांना ‘जर्सी गाई’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण मराठी माणूस याचा किती फायदा करून घेणार आहे हा कळीचा मुद्दा आहे.
‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?
तुम्हाला काय वाटते?

Monday, January 11, 2016

तणाव...!!

शिक्षणहक्क कायद्याखाली विद्यार्थ्याचे सतत आणि सखोल मूल्यमापन व्हावे, एकदोन परीक्षांच्या आधारे त्याची ‘लायकी’ ठरविली जाऊ नये, अशा भूमिकेतून आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचे धोरण आणण्यात आले होते. त्याचा हेतू चांगला होता. परंतु, काही मुलांनी आणि शाळांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला...

................

स्मृती इराणी या खरे तर वादग्रस्त मंत्री. त्यांच्या जवळपास प्रत्येक वक्तव्याबाबत वाद झाले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा, ‘आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचे धोरण बदलण्याचा सरकारचा विचार आहे,’ अशा आशयाचे विधान त्यांच्याकडून ऐकले तेव्हा सुखद धक्का बसला. आठवीपर्यंत नापास करायचे नाही, म्हणजे त्याचे मूल्यमापनही करायचे नाही, असा अर्थ काही शाळांनी घेतला की काय कोणास ठाऊक. मुलांनी मात्र शिक्षण न घेता वरच्या वर्गात जाण्याचा परवाना मिळाल्यासारखे वागायला सुरुवात केली. आज आठवीत गेलेल्या सामान्य मुलाला खरोखरच काय येते याचा आढावा घेतला तर धक्कादायक बाबी उघड होतात. अर्थात याला दुसरी बाजूही आहे. ही मुले जर इतकी ‘ढ’ असतील तर मग शिक्षक काय करत होते, त्यांना शिकविण्याचे काम शिक्षकांचे नाही का, असा प्रश्न विचारला जातो. तो काही अंशी खराही आहे. शाळेत जाऊनही शिकायची इच्छा नसणारे मूल शोधून सापडणारे नाही. मग त्याची अशी अवस्था का व्हावी? या सगळ्यात विरोधाभास असला तरी आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयाने मुलांचे शैक्षणिक नुकसानच झाले हे नाकारून चालणार नाही.



शिक्षणहक्क कायद्याखाली विद्यार्थ्याचे सतत आणि सखोल मूल्यमापन व्हावे, एकदोन परीक्षांच्या आधारे त्याची ‘लायकी’ ठरविली जाऊ नये, अशा भूमिकेतून हे धोरण आणण्यात आले होते. त्याचा हेतू चांगला होता. परंतु, काही मुलांनी आणि शाळांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. नापास होणार नाही, मग निकालाच्या तणावाखाली कशाला राहायचे, असा विचार काही विद्यार्थ्यांनी केला. काही शिक्षकांनाही हे सततचे मूल्यमापन जाचक वाटायला लागले. आधीच सरकारने भरपूर कामाला लावले आहे, त्यात हे वाढीव काम कशाला असा दृष्टिकोन झाला. त्यातून ही योजना फसत गेली. सगळ्यांनीच असा चुकीचा अर्थ घेतला असे नाही, पण ज्या सामूहिकरीत्या ही योजना राबवायला हवी होती, ती तशी राबविली गेली नाही, हे खरे. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती निर्माण झाली. आपल्याकडे दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे सर्वात मोठे ओझे आहे, असे समाजाने आणि शैक्षिणिक व्यवस्थेने ठरविल्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण झाले. या वर्षी, मार्च परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याची परीक्षा लगेच उरकून घेतली गेली हे बरे झाले. नाही तर एकदा का नावावर नापासाचा शिक्का बसला की मग त्यातून सावरणे विद्यार्थ्याला फार कठीण जाते. त्याच्या मनावरचे ओझे वाढवायला पालक, नातेवाईक आणि समाज असतोच. याही बाबतीत काही ठोस निर्णय घ्यावा लागेल.

***

भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल दिसत असले आणि इंटरनेटचा वापर सतत वाढत असल्याचे म्हटले जात असले तरी खऱ्या अर्थाने इंटरनेट क्रांती अजून पूर्णपणे झालेली नाही. तरीही बँकिंग क्षेत्रात पेमेंट बँकांना परवानगी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. या पेमेंट बँकांचे काम काय असणार, त्या बँक व्यवहारांशी जवळीक नसणाऱ्या सामान्य माणसाला फायदेशीर कशा आहेत, वगैरे बातम्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की आतापर्यंत ज्या बँका ग्राहकाला राजा मानत नव्हत्या, त्या बँकांचा कारभार यामुळे सुधारणार आहे की नाही? १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि या बँका भारतीयांच्या पैशाच्या जणू एकमेव आशास्थान बनल्या. परंतु, नंतरच्या काळात, विशेषत: गेल्या दीड दशकात खासगी बँका आल्यावर आणि बऱ्याच ग्राहकांनी तिकडे मोर्चा वळविल्यावर राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था पार चांगली राहिलेली नाही. व्यवसाय कोणताही असो, आज ग्राहक हाच राजा झाला आहे. हे जो लक्षात घेत नाही, तो लवकर डबघाईला येतो.

या बँकांपुढच्याही काही अडचणी आहेत हे मान्य. अपुरा कर्मचारीवर्ग सारे काम हाताळायला आणि ग्राहकाचे समाधान करायला असमर्थ ठरत आहे. असंख्य निर्बंधांमुळे, खासगी बँकांमध्ये होत नसलेला नियमांचा बागूलबोवा इथे मात्र दिसतो, याचा अनुभव मी अनेकवेळा घेतला आहे. काम नियमाने व्हायला हवे हे मान्य, पण ग्राहकाचाही विचार व्हायला नको का? हे सारे फक्त पेमेंट बँकेनेच बदलेल असे नाही. त्यासाठी आणखी बरेच काही करावे लागेल. प्रशासन लोकाभिमुख करावे लागेल. नाहीतर इंटरनेटच्या आक्रमणामुळे टपाल खात्याची जी अवस्था झाली आहे, ती बँकांची व्हायला वेळ लागणार नाही. राष्ट्रीयीकृत असोत वा खासगी वा सहकारी, आज प्रत्येक बँक ग्राहकाने बँकेत न येता घरच्या घरी कम्प्युटरवरून अथवा मोबाइलवरून बँकेचे व्यवहार करावेत, यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक लोकांना नेटबँकिंगची भीती वाटते. ती घालविण्याचे काम सुरू आहे. एकदा सारे व्यवहार ऑनलाइन झाले की बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकेल किंवा त्यांना अन्य कामात हलवावे लागेल. ऑनलाइनचा हा फटका प्रत्येक व्यवसायाला बसणार आहे. ते ओळखून सध्या बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकाला असमाधानी अवस्थेत परत पाठविले गेले तर बँकांवरच त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. १९६९च्या निर्णयाचे चक्र उलटे फिरविण्याची हीच वेळ आहे का?

***

एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू, असे आपल्या आयुष्यात बरेच वेळा होते. हा प्रकार गेल्या १५ दिवसांत खेळाच्या मैदानावर भारताला दोनदा अनुभवावा लागला. क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून झालेला पराभव वेदनादायी होता हे खरे, पण त्याहूनही अधिक वेदना देणारा होता तो सायना नेहवालचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत झालेला पराभव. कोणत्याही पराभवानंतर त्याचे विश्लेषण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, अशा थाटात प्रत्येक भारतीय वागत असतो आणि आपलेच कसे खरे आहे हे तावातावाने सांगतही असतो. भारतीय खेळाडू अंतिम फेरीपर्यंत जातात पण शेवटच्या सामन्यात हार पत्करतात. त्यांच्याकडे अंतिम घाव मारण्याचे कसब (किलर इन्स्टिंक्ट) नाही का, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. टेनिसमध्ये आपल्याकडे अमृतराज बंधू होते. त्यांची झेप एखादा अपवाद सोडला तर जेमतेमच होती. रामनाथन कृष्णन आणि रमेश कृष्णन हेही ग्रँड स्लॅमचे एकेरीचे मैदान कधी मारू शकले नाहीत. नंतर आलेल्या लिएंडर पेसने मात्र एकेरीत नाही तरी दुहेरीत उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. हे जसे टेनिसचे तसेच बॅडमिंटनचे. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर सायनाच चमकली. पी. व्ही. सिंधूची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. हेच इतर खेळाडूंबाबत होताना दिसते आहे. एखादा विश्वनाथन आनंद पुढे येतो, बाकीचे एका विशिष्ट

टप्प्यापर्यंतच जातात. म्हणजे प्रत्येक खेळातला राष्ट्रीय विजेता, जागतिक विजेता व्हायला जे अंगात असावे लागते ते बहुतेकांमध्ये नसते. सायनाचा याला अपवाद आहे. आजच्या घडीला ती जागतिक क्रमवारीवर पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळेच तिच्या पराभवामुळे एका डोळ्यात आसू असले तरी दुसऱ्या डोळ्यात हसू आले.

टेनिसप्रमाणेच बॅडमिंटनमध्येही गेल्या पाच वर्षांत खूप नव्या ताज्या दमाच्या मुली आल्या आहेत. त्यांच्यामुळे या खेळातली स्पर्धा अधिकाधिक तीव्र झाली आहे. यामुळे सायनालाही आपला खेळ अधिक उंचावावा लागत आहे. सायना स्वत: अधिक तणावाखाली खेळत आहे, जागतिक स्पर्धेचा अंतिम सामना हा इतर कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीसारखा शांतपणे खेळायला हवा, असे प्रकाश पदुकोण म्हणत असले तरी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप तणाव येणार हे उघडच आहे. परंतु, अशा तणावाखाली खेळूनच जिंकणाऱ्या खेळाडूलाच विजेतेपदाचा चषक मिळतो हेही खरे आहे. सायनाला मन:पूर्वक शुभेच्छा!

द्रविडा'यन

बुद्धिबळामध्ये वजीर असतो. हा वजीर कोणतीही चाल चालू शकतो. आपले राज्य वाचवण्यासाठी तो शेवटच्या श्वासापर्यंत जिकिरीचा लढा देत राहतो. असाच एक वजीर भारतीय क्रिकेटच्या नशिबाने लाभला, त्याचे नाव राहुल द्रविड. डाव जिंकण्यासाठी ज्याप्रकारे अगदी विचारपूर्वक पद्धतीने वजीराला वापरले जाते, त्याच प्रकारे भारतीय संघाने द्रविडचा विचापूर्वक वापर केला. द्रविडच्या करियरमध्ये त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यात आले. सातव्या क्रमांकापासून ते पाचव्या, चौथ्या कधी-कधी तर अगदी वन डाऊन म्हणूनही द्रविड बॅट घेऊन मैदानात ठाण मांडायचा. त्यातही तिसरा क्रमांक त्याला सर्वात जास्त मानवला.


सामन्यांचे फॉरमॅट, खेळाचे नियम आणि स्पर्धा कोणतीही असो, द्रविडने आपले सातत्य सोडले नाही. कालांतरानं किपींगमध्येही त्याने हात आजमावला. स्लीपमधून हळूहळू आत सरकत पठठ्या थेट विकेट्स राखू लागला. स्टम्पच्या जवळ उभे राहणे, स्टम्पिंग, अपिलींग सर्वकाही द्रविड जणू सराईताहून सरस करू लागला. हात लावेल त्यांच सोन करणाऱ्या द्रविडने टीमच्या गरजेनुसार सतत स्वत:ला वेगवेगळ्या रोलमध्ये फिट बसवले. द्रविडला पूर्ण ऑल राऊण्डर म्हणतात. त्याच्या बॉलिंगची आकडेवारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे, पण तीही टीपीवाल्या सामन्यात गोलंदाजी करून स्कोअरकार्डवर लागलेली. खरोखरच द्रविडला गोलंदाजी नेहमी करायला दिली असती तर आज तो ऑल टाइम फेव्हरेट ऑलराऊण्डर झाला असता. तरीही गोलंदाजीची छुटूरपुटूर आकडेवारी पकडूनही द्रविड ऑलराऊण्डरच आहे.

हा निस्वार्थी माणूस अनेक अविस्मरणीय खेळ्यांमध्ये कायम ऑन अदर एण्ड असायचा. काम करतात दोघे, पण प्रसिद्धी एकाच्या नावाने असे अनेकदा होते. द्रविडबद्दल अनेकदा असे झाले आहे. द्रविड चांगला खेळला तर समोरचा अधिकच छान खेळायचा. त्यामुळे वर्तमानपत्रातील फ्रंट पेज फोटोपासून 'मॅन ऑफ द मॅच'पर्यंत सर्व काही समोरच्याच नशिबी. पण द्रविडने याबद्दल कधीही कुठेही तक्रार केली नाही. इतर लोक मानसन्मान स्वीकारतानाही द्रविड मैदानाप्रमाणेच 'ऑन द अदर एण्ड'वरून पाहायचा. ज्या प्रकारे कलाकार एखादी कलाकृती लोकांना किंवा चाहत्यांना आनंद देण्यासाठी तयार करतो तसा द्रविड संघासाठी खेळायचा. स्वार्थासाठी द्रविडने सामन्यात गोंधळ घातल्याचे ऐकिवात नाही. अगदी सचिनपासून अनेकांवर हा फक्त रेकॉर्डसाठी खेळतो अशी टीका झाली. मात्र द्रविडबद्दल असे कधी नाक्यावरच्या गप्पांमध्येही ऐकण्यात आले नाही. याउलट द्रविडकडे जंटलमॅन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून पाहिले जायचे. Quotes on Dravid हे गुगल केल्यावर क्रिकेटचे जाणकार द्रविडबद्दल काय म्हणतात ते कळेलच; पण सामान्यांमध्येही द्रविड म्हणजे सभ्यता, संयम, संकटमोचक, परफेक्ट स्पोर्टमॅन म्हणूनच लोकप्रिय आहे अगदी आजही.

द्रविड तसा कमनशिबीच. करियरमधील सर्वच फॉरमॅटमधील शेवटचे सामने द्रविड खेळत असलेला संघ हारला. टी-२०, एकदिवसीय, टेस्ट अगदी चॅम्पियन्स लीगही द्रविडचा संघ हरला. आकडेवारी सोडली तर द्रविडची मिळकत ही त्यांच्या इतर संघ सहकाऱ्यांपेक्षा नक्कीच उजवी आहे. कधीच कोणत्या वादात नाही, नियम मोडले नाहीत, आरोप-प्रत्यारोप नाही, गटबाजी नाही, स्लेजिंग नाही, उद्दटपणा किंवा गर्वाने वागणे नाही, चाहत्यांकडून टीकेऐवजी प्रेमाचाच जास्त पाऊस द्रविडवर पडला, मात्र, प्रेम करताना किंवा निवड करताना अनेकांसाठी द्रविड सेकेण्ड बेस्ट किंवा दुसरा पर्याय म्हणूनच होता. खूप कमी लोकांसाठी द्रविड फर्स्ट होता. ट्विटरवर लाखांत फॉलोअर्स असूनही द्रविडचे अकाऊण्ट व्हेरिफाइड याला काय म्हणायचे? इथेही तो कमनशिबीच की ट्विटरचे दुर्लक्ष हेच कळत नाही.

सुरुवातीच्या कसोटी, एकदिवसीयपासून ते कारकिर्दीच्या उत्तरार्धातील टी-२०शी जुळवून घेणारा द्रविड अवर्णनीयच! म्हणजे सचिनच्या भन्नाट खेळ्यांमध्ये चोरटी धाव काढून स्ट्राइक देणारा द्रविड होता, लक्ष्मणच्या स्पेशल २८१च्या खेळीत जोडीदार द्रविड होता. सौरव गांगुलीने जिंकायला शिकवले तर द्रविडने क्रिजवर उभे राहायला शिकवले, पण यातील फक्त पहिलाच भाग अनेकांच्या लक्षात आहे. इतर तिघांमुळे हा फ्रेममध्ये दिसत नाही, पण तो सिक्रेट गार्डियनसारखा पाठीराखा आहे. आजही द्रविड भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा शोध घेतोय ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपातून. रिटायर झाल्यानंतर मध्यंतरी द्रविडने कॉमेन्ट्री बॉक्समध्ये अनेकांना शब्दांत पकडून 'क्लिन बोल्ड' केल्याचे किस्सेही व्हायरल झाले होते.

द्रविडबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण माझ्यासारखा त्याचा एक चाहता त्याच्या सर्व पैलूंबद्दल कसे लिहू शकणार? तुम्हालाही द्रविडच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकायचा असेल तर खालील कॉमेंट सेक्सनमध्ये तुमची मतं नक्की मांडा. 'मिस्टर डिपेंडेबल'बद्दलची तुमची मते त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडतील.

Friday, January 8, 2016

गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल

गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल - मराठी कविता | Ganapaticha Aashirwad - Modak Special - Marathi Kavita
नेवेद्यासाठी आईने
खोबरे घेतले खोवायला
समोरच्या आमराईने
दिले तोरण दाराला
आजच्या खोबर्‍यामध्ये असे
काय होते खास?
प्रसाद म्हणुन मिळणार होता
गोड मोदकाचा घास
हळूहळू वितळू लागला
गूळ खोबर्‍या भोवती
निरांजनात मिठी मारून
बसल्या होत्या वाती
श्वेत मुलायम समईमध्ये
भरले मोदकाचे सारण
धावणार्‍या नात्यांना लाभले
भेतावयाचे कारण
अनोख्या शब्दांच्या आरत्या
पितळी झांजांची त्यांना साथ
गुणगान ऐकूनी प्रिय पुत्राचे
प्रसन्न झाले भोलेनाथ
दुर्वांकूर व जास्वंद
झाल्या मस्तकी विराजमान
पंचपक्वानांनी नटले
सुगरास केळीचे पान
मुखी जेव्हा विरघळतो माझ्या
मोदकाचा हा प्रसाद
आभार त्या गणरायाचे
दिधला मोदकरूपी आशीर्वाद

माझं दैवत घरात

माझं दैवत उभं
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
'आशीर्वाद' देण्यास.
माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी
चुकले मनास
'वैभवाचं मंदिर'
त्यावर कळस.
'तुळशीसम' प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
"मना हिरवं रोपटं".
आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.

चांदण्यात फिरताना भाग २

स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं.
“काय झालं स्मिता? गप्प गप्प असतेस?” तशी स्मिता रडायला लागली.
“अगं, मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना. कुठे गेला कळतंच नाही मला.” रडतच ती सांगत होती.
“मग त्याला फोन करायचा ना.”
“नाही वापरत तो mobile.”
“पहिलं तुझं रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते.” स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली.
“तुला सांगितलं होतं ना तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला तेव्हापासून आज आठवडा झाला तरी तो मला भेटलाच नाही.”
“अगं उशिरा निघत असेल तो.”
“नाही गं. रोज एक तास तरी थांबते मी. नाहीच येत तो.”
“आणि mobile चं काय बोललीस?”
“तो म्हणायचा गावात रेंज नाही येत मग mobile कशाला वापरायचा. घरीही फोन नाही. गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो. कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ
भेटायलाच जातो, असं म्हणाला तो.” दोघीही गप्प झाल्या.
“आता काय करायचं गं. पप्पा बोलले मी येऊ का गावात त्याची चौकशी करायला.”
“नको, पप्पांना नको बोलावू. मला वाटते तो ना चोर असणार. गावात असे खूप असतात गं फसवणारे. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर. तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया हरवल्याची.”
“ठीक आहे. चल.” असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या.


“सर, आम्हाला एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे.”
“ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा?” तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या.
“नाही. फोटो तर नाही आहे.” स्मिताची मैत्रीण म्हणाली.
“फोटो नाही. मग त्याला शोधणार कसा. बरं नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा.” पोलिसांचा पुढचा प्रश्न.
“त्याचं नाव आहे यश.”
“पूर्ण नाव सांगा बाई.”
“माहित नाही सर.”
“बरं, पत्ता?”
“तोही माहित नाही.”
तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. “तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढं साधं माहित नाही तुम्हाला.”
दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक त्या पोलिसाला त्यांची दया आली.
“बरं, त्या यशला कोणी पाहिलं आहे का?”
“हं... हो मी बघितलं आहे.” स्मिता लगेच बोलली.
“तो बघा, त्या खोलीत आमचा स्केच artist आहे. त्याचं वर्णन करून सांगा त्याला. तो काढेल चित्र त्याचं. मग आम्हालाही बरं पडेल शोधायला. मी आता बाहेर जातो आहे, चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या, आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो.” असं म्हणून तो पोलिस निघून गेला.
स्मिता लगबगीने त्या रूम मध्ये गेली.
“मला सविस्तर वर्णन सांगा. तसं मी स्केच काढतो.” स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला.
“थांबा.”
“का? काय झालं?”
“तुम्ही “आधार” हॉस्पिटल मध्ये काम करता का?” त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या.
“आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार.”
“हो. आम्ही आधार हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित?”
“मग हे स्केच काढायची गरजच नाही.” असं म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली.
“हि फाईल बघा. वेगळीच फाईल बनवली आहे मी.” फाईल उघडताच एक स्केच होतं. यशचचं.... अगदी हुबेहूब...!
“हाच.. हाच यश आहे.” स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला.
“पण याचं स्केच तुमच्याकडे कसं?” तसा तो हसला.
“तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे?”
“हो. आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो.”
“मग बरोबर. तुम्हाला माहीतच नसणार.”
“काय ते?”
“तुमच्याच हॉस्पिटल मधल्या आतापर्यंत ९ जणींनी येथे ‘यश’ संबंधी तक्रार नोंदवली आहे.” तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या.
“बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत. ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने.”
“कोणी? संगीता नाव होतं का तिचं?”
“हो. संगीताच नाव होतं तिचं.”
“आणि पुन्हा विचार करा या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारायला आले नाही. तुम्ही उगाच तक्रार करू नका.”
“पण, त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत?”
“सगळ्याच्या तक्रारी तो हरवल्याच्या आहेत.”
“हे कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका.” स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली,
“‘मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा?”
“या ९ तक्रारी गेल्या १० वर्षातल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त. जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली. इकडे आता सगळेच नवीन आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचं तसं काही माहित नाही. पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या. त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला. आता एवढा माणूस जाणार कुठे? तरी मला वाटते तो चोर असावा. शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल. पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित. आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची.नाहीतर गेलो असतो तिकडे पण. तुम्ही तसच करा. तक्रार करू नका. तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. मी कळवतो काही कळल तर.” त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
“हे कसं शक्य आहे? जो माणूस मला रोज भेटायचा तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो?” स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली.
“काही तरी नक्कीच गडबड आहे. मला तर वाटते.”
“काय?”
“तो खरंच चोर असेल गं.”
“अगं, मग तो पोलिसांना कसा भेटत नाही.”
“माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता.”विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला. अचानक तिला आठवलं त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो.
“काय नाव होतं कंपनीचं.. हा...Eco. तेच नाव होतं. त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होतं मी.” आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि “Eco” नावाची एक कंपनी होती, शहरापासून थोडी अलीकडे. शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं, त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही. अगदी बॉसलाही. तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं. स्मिताला रडूच आलं. आता कुठे शोधू मी त्याला. रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.
तेवढयात मागून “थांबा madam” असा आवाज आला.
वॉचमननी हाक मारली होती. “काय झालं madam? कशाला रडता. बसा इकडे. उनाचं बाहेर नका जाऊ. पाणी प्या.” स्मिता शांत बसली आणि पाणी पिऊन बरं वाटलं.
“काका, मी इकडे आले होते एकाला शोधायला. पण इकडे कोणालाच माहित नाही.”
“कोणाला?”
“यश नाव आहे त्याचं.”
“यश साहेब..” वॉचमन बोलला. तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली.
“तुम्ही ओळखता त्याला? कुठे आहे आता तो?”
“माहित नाही madam. यश साहेब होते इकडे कामाला पण १० वर्षापूर्वी. नंतर कुठे गेले माहित नाही आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत.” या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला.
“हा पण आमचे जुने साहेब त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांना माहित असेल.” ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात. खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्यांचं घर.
“नमस्कार सर, तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना?” दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला.
“हो. पण तुम्ही कोण?” आता त्यांना खरं तर सांगू शकत नाही.
“मी स्मिता, यशची मैत्रीण. तुम्ही ओळखता ना यशला.”
“तुम्ही प्रथम आतमध्ये या. मग बोलू आपण.” तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली.
“हं... बोला आता. काय काम होतं तुमचं? आणि यशची कशी ओळख?”
“मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे.” स्मिताला खोटंच बोलावं लागलं.
“खूप वर्षांनी आली मी भारतात. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला. मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.”
“यश Actually मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.”
“म्हणजे?”
“तो होता माझ्या हाताखाली कामाला. चांगला होता. पण १० वर्षापूर्वी.”
“१० वर्षापूर्वी?”
“हो. मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.”
“नक्की काय ते मला कळलं नाही सर.”
“तो अचानक जॉबला येईनासा झाला. नंतर काही तो आला नाही कधी.” सर बोलत होते.
“मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का?”
“केलेला. एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो. पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते.”
“तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा?”
“आहे ना. ‘कुंभार’ गावात सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. ‘धर्माधिकारी’ नाव आहे घराचं.”
“अरे, माझ्या रूमच्या मागेच आहे घर वाटते.” स्मिता मनातल्या मनात बोलली.
“तरी तुम्हाला काय वाटत सर, कुठे गेला असेल तो?”
“तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता. त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस. म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाणं त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते. परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.”
“बायको?” स्मिता उडालीच.
“तशी बायको म्हणता येणार नाही. पण लग्न करणार होते ते लवकरच. मग तिच्या बरोबर तो गेला असेल.”
“काय... काय नाव होतं तिचं?”
“नाव... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती. इकडे पुढे ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे ना तिकडे डॉक्टर होती ती. नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.”
“बरं, Thanks Sir” असं म्हणत यशचा गावातला पत्ता घेऊन ती निघून आली. सगळंच काही विचित्र होतं. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून.... कदाचित.

चांदण्यात फिरताना भाग 1

“आज उशीर केलास तू? कूठे होतास? कधीची वाट बघते आहे तुझी." स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती.
“अगं, काम होतं थोडं. बॉसनी सोडायला नको म्हणून थोडासा उशीर झाला” तरीही ती रुसलेलीच होती. यश सुद्धा मग तसाच बसून राहिला तिच्या शेजारी. थोडावेळ असाच गेला.
“बोल ना काहीतरी. गप्प का झालास?”
“तू बोलतच नाही आहेस आणि मी एकटाच बडबड करत आहे. लोकांना वाटेल मी वेडा आहे.” तशी स्मिता हसली.
“काय छान सुगंध येतो आहे?” स्मिता म्हणाली.
“मोगऱ्याची फुलं आणली होती, आता तू रागावली आहेस, मग यांचा काय उपयोग देतो टाकून.”
“नको. नको. वेडा आहेस का? मला आवडतात ती.” असं म्हणत तिने स्वतःहूनच फुलं घेतली.
“काय रे, तुझ्या ऑफिसमध्ये मोगऱ्याचं झाड - बीड आहे वाटते.”
“हो गं, ऑफिसच्या बाहेर एक झाड आहे मोगऱ्याचं. कोणी हात लावत नाही त्याला. मग मीच ती फुल घेऊन येतो तुझ्यासाठी.”
“अरे, पण फुलं तर सकाळचीच फुलतात ना? मग तुला कुठून भेटतात ही फुलं? जादूचं झाड आहे वाटते. बघितलं पाहिजे एकदा.”
“तसं काही नाही गं जादू - बिदू. कळ्यांना सांगतो मी आपल्याला स्मिताला भेटायला जायचे आहे की फुलतात ती आपोआप.” तशी स्मिता लाजली.
“मुलींना इम्प्रेस कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं ना.” स्मिता म्हणाली, तसं यशला हसायला आलं. त्याचबरोबर छान थंड हवेची झुळूक आली.
“मघापासून किती उकडत होतं. तू आलास आणि सगळं कसं छान थंड थंड झालं. मी observe केलं आहे खूपदा कि तू आलास कि छान गार गार वारा सुटतो, आजुबाजूचं शांत शांत होते. कसं काय रे..?”
“त्याचं काय आहे, निसर्ग जरा जास्तच खुश असतो नेहमी माझ्यावर आणि तू असल्यावर तर असं होणारच ना जादू केल्यासारखं.”
“मी काय जादुगार आहे?”
“मग, माझ्यावर नाही केली आहेस का जादू?”
“गप्प रे, काहीही बोलतोस.” तिला हसायला आलं.
“अजून एक गोष्ट, आज सुद्धा मोगऱ्याचा सुगंध आला. तू येण्याआधी मोगऱ्याचं अत्तर लावतोस वाटते. हो ना?” तो नुसताच हसत होता. “आणि तुला गेल्यावेळेस विचारलं होतं, त्याचं उत्तर अजूनही नाही दिलंस मला."
“कोणता प्रश्न?"
“दर पोर्णिमेला तू गायब असतोस आणि अमावस्या असली कि तुझा चेहरा जास्तच उजळत असतो, मेकअप वगैरे करतोस का अमावस्येला?”
“चंद्राला लाज वाटू नये म्हणून मी पोर्णिमेला बाहेर पडत नाही आणि अमावस्या असली कि मी जास्त उजळत असतो ना म्हणून चंद्र येत नाही.” “सांग ना रे”, स्मिता लाडातच म्हणाली.
“खर तर आमचा बॉस आहे ना तो जरा भित्रा आहे आणि अंधश्रद्धाळू. पण त्याला कोणीतरी सांगितलं आहे कि पोर्णिमेला केलेली कामं फायदा करून देतात म्हणून तो सगळ्यांना थांबवतो रात्रभर आणि अमावस्या आली कि तो दुपारीच पळतो घरी. त्यामुळे आम्ही सगळे मोकळे असतो. त्यादिवशी काहीच tension नसते म्हणून तुला माझा चेहरा उजळतो आहे असं वाटत असेल.”
“असेल असेल तसच काहीतरी." स्मिता म्हणाली.
“अरेच्या... बोलता बोलता कधी आपल्या वाटेवर आलो ते कळलंच नाही." यशच्या बोलण्याने स्मिता जागी झाली.
“हो रे..! कळलंच नाही."
“चल बाय. उद्या भेटू संध्याकाळी.”
“आणि हो उद्या लवकर ये, फुलं घेऊन ये.”
“रोज तर आणतो. उद्या सुद्धा आणीन. बाय..!” असं म्हणत यश आणि स्मिता आपापल्या वाटेने घरी जाण्यास निघाले.

स्मिता आणि यशची ओळख तशी ६ महिन्यांपूर्वीची. स्मिता Actually मुंबईत राहणारी, डॉक्टर होती ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई मध्येच एखाद्या मोठया आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेल असं तिला वाटत होतं आणि तसं झालं ही. मुंबईत मोठया हॉस्पिटलमध्ये तिला job मिळाला पण तो आनंद फक्त तीन महिनेच टिकला. कारण त्या हॉस्पिटल मधून कोल्हापूरला गेलेली एक महिला डॉक्टर आजारी पडली म्हणून तिची जागा भरून काढण्यासाठी स्मिताला तिकडे पाठवलं गेलं.
“काय वैताग आहे, मला कशाला पाठवत आहेत?” स्मिता रागातच तिच्या मैत्रिणीशी बोलत होती.
“अगं, त्यात काय रागवायचे. तू नवीन आहेस म्हणून तुझं नाव पुढे केलं आणि तुला चांगला अनुभव मिळेल ना गावात सुद्धा."
“ठीक आहे गं. पण तिला काय झालं नक्की?”
“माहित नाही. कोणालाच माहित नाही आणि कोणी सांगतही नाही बरोबर. सरांकडून ऐकलं जरासं कि ती वेडी झाली”.
“वेडी?”
“अगं म्हणजे तशी वेडी नाही. मानसिक धक्का बसला आहे असं म्हणतात”.
“म्हणजे मी पण वेडी होणार.” आणि दोघीही हसायला लागल्या. आठवड्याने तिला कोल्हापूरला जायचं होतं. जरा वाईटच वाटत होतं तिला. गावात कधीच गेली नव्हती ती अगदी लहानपणापासून. लहानाची मोठी ती शहरातच झाली होती. “पण ठीक आहे” असं म्हणत ती कोल्हापूरला दाखल झाली. तिकडे तिची राहण्याची व्यवस्था सरकारी क्वॉर्टर्स मध्ये केली होती. प्रोब्लेम तर वेगळाच होता. हॉस्पिटल आणि तिची रूम यामध्ये खूप अंतर होतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूस कोणतीच व्यवस्था नव्हती. तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. जशी तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुरुवात केली तसे वेगवेगळे प्रश्न समोर यावयास लागले. गावातली वस्ती तेवढी सुधारलेली नव्हती. एकच शाळा होती तीसुद्धा मोडकळीस आलेली होती. कच्चे रस्ते, वाहन जवळपास नाहीच. प्रवास चालायचा तो बैलगाडीतून. एकदोघांकडे सायकल होत्या. सरपंचाकडे तेवढी गाडी होती, तीसुद्धा कधी कधीच घराबाहेर यायची. S.T. च्या बसेस यायच्या गावात ठरलेल्या वेळेत. सकाळी ६.३०ला आणि संध्याकाळी ५ला. काळोख होण्याच्या आत. गावात वीज तर नुकतीच आली होती, तीपण लोड-शेडींग असलं कि रोज ५ तास जायची. फक्त स्मिताच्या रूमची वीज असायची कारण ती सरकारी घरात रहायची म्हणून. रस्त्यावरती दिवे होते पण दिव्यांची संख्या खूप कमी होती.
एक दिवा इथे तर दुसरा खूप लांब असायचा. त्यामुळे रस्त्यावर प्रकाश तसा नाहीच. बरं.. हॉस्पिटल जवळ घर बघावं तर तिथे सगळे रूम अगोदरपासूनच बुक झालेले. त्याहून तिकडे पैसे जास्त. मग तिने तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. रोज ती लवकर निघायची घरी जाण्यासाठी. बस सुद्धा वेळेवर असायची ना. एका दिवशी मात्र तिला निघायला वेळ झाला. धावतच ती बाहेर आली. तर तिला तिची बस जाताना दिसली.
“आता काय करायचं? पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाऊया का?” हॉस्पिटल मध्ये कोणीच थांबत नव्हतं. त्यामुळे तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता. तसंच तिने पायी पायी जाण्याचा निर्णय घेतला. स्मिताला रस्ता माहित होता. परंतु तोच रस्ता बरोबर आहे कि नाही याची शंका होती. तेवढयात एक बैलगाडी येताना दिसली.
“काय व्हो, कोनीकडं चालता आहात वो बाई?”
“अहो मला गावात जायचे आहे, बस सुटली माझी.”
“मंग, एकटया जावू नका. बसा. म्या सोडतो तुमाला.” तिला बरं वाटलं. हळूहळू करत बैलगाडी एका ठिकाणी येउन थांबली.
“बाई, इकडून तुमाला एकटीला जावं लागेल. माजी वाट दुसरी हाय.” नाईलाजास्तव तिला उतरावं लागलं.
“मी कुठून जाऊ आता?”
“दोन वाटा हायत. हि एक सरल वाट हाय, पन तिकडून कोनी जात नाय. दुसरी वाट हाय ती मोठी हाय. तिकडं असत्यात लोकं तिकडून जावा. बरा! म्या निगतो हा सांभाळून जावा.” अस म्हणत तो निघून गेला. दोन रस्ते होते. एक मोठा आणि दुसरा short -cut. खूप वेळ सुद्धा झालेला. “काय करूया. short -cut घेऊया.” असा विचार करून स्मिता short -cut ने निघाली.
बैलगाडीवालाच्या बोलण्याप्रमाणे कोणीच नव्हते तिथे, एकटीच चाललेली होती. दिवे होते लांब लांब. नशीब तिच्याकडे torch होता. मिट्ट काळोख. त्यात भर पडली ती अमावस्येची. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता. त्यातून कसले कसले आवाज येत होते. गावात पहिली कधीही न आलेली आज एकटी चालत होती काळोखातून. प्रचंड घाबरलेली. अचानक कुठून तरी एक कुत्रा भुंकत आला. तशी ती धावतच सुटली आणि रस्ता चुकली. कुत्रा तर गेला कुठेतरी. “आता कुठे जायचे?” विसरलीच ती. आजूबाजूला कोणीच नाही. काळोख सगळीकडे, mobile ला रेंज नाही. तिला रडूच आलं. दिव्याखाली ती रडत बसली. ५-१० मिनिटं झाली असतील. एकदम थंड हवेची झुळूक आली. हवेच्या झोताबरोबर मोगऱ्याचा सुगंध आला. छान वाटलं तिला आणि मागून आवाज आला, “Excuse me, मी काही मदत करू का तुम्हाला?”

स्मिताने मागे वळून बघितलं. एक मुलगा उभा होता. उंच, गोरापान, मजबूत शरीरयष्ठी, पाणीदार डोळे आणि तेजस्वी चेहरा. वय असेल २७-२८ च्या आसपास. अगदी राजबिंड व्यक्तिमत्व.
“Hello madam, काय झालं तुम्हाला? कशाला रडत आहात? काही मदत करू का?” आणि स्मिता भानावर आली.
“हं... हो.. मी रस्ता चुकले आहे. इकडे नवीन आहे मी आणि इकडे कोणीच नव्हते. घाबरले मी आणि रडायला आलं मला.”
“घाबरू नका तुम्ही. कुठे राहता तुम्ही?”
“तिथे कुंभार गाव आहे ना तिथे सरकारी क्वॉर्टर्स मध्ये राहते मी.”
“ठीक आहे. मी पण तिकडूनच जात आहे. पाहिजे तर तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर.” स्मिताने त्याला निरखून पाहिलं. छान असा कडक इत्री केलेला निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर लाल रंगाची टाय, पांढऱ्या रंगाची trouser, polish केलेले शूज आणि खांद्यावर Laptop ची मोठी bag.” चांगला माणूस वाटतो, निदान सोडेल तरी घरी आपल्याला”, असा विचार करून ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली.
“तुम्ही नवीन असूनही या वाटेवर कशाला आलात? इथून कोणी जात नाही सहसा. सकाळी वेगळी गोष्ट आहे. पण रात्री कोणी नसते इथे. “Actually, माझी बस miss झाली आणि बैलगाडीतून इकडे आले. लवकर पोहोचण्यासाठी short-cut घेतला आणि वाट चुकले. पण तुम्ही कसे या वाटेवर. कोणी येत नाही असं म्हणता तुम्ही. मग तुम्ही कसे?” स्मिताने उलट प्रश्न केला. त्यावर तो हसला.
“माझी हीच वाट आहे. मला short-cut घ्यावाच लागतो. माझं गाव तुमच्या गावापेक्षा अजून खूप लांब आहे आणि मला भीती वाटत नाही त्यामुळे मी इथूनच जातो नेहमी.”
“त्यात आज अमावस्याही आहे ना. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता वाटेवर.” स्मिता चालता चालता म्हणाली.
“नाही. तिकडे तरीही काळोख असतोच. पण अमावस्येचा एक फायदा असतो.”
“कोणता?”
“वर आकाशात बघा जरा.” तिने चालता चालताच वर पाहिलं. असंख्य तारे लुकलुक करत होते. असं दृश्य ती पहिल्यांदाच बघत होती. शहरात सगळीकडेच प्रकाश पसरलेला असतो. चंद्रच असतो फक्त आभाळात. पण गावात तसं नसत ना. ती बघतच राहिली आभाळाकडे.
“किती चांदण्या - तारे आहेत. बापरे..!” आश्चर्याने बोलली स्मिता. तशीच चालत होती ती.
“चला madam, तुमचं गाव आलं”.
“अरे हो, कळलंच नाही चांदण्यांकडे पाहता पाहता आणि तुम्ही कुठे चाललात?”
“माझा हा रस्ता, तुमचा तो. मी जातो या रस्त्याने. सांभाळून जावा घरी.”
“Ok ... thanks” म्हणत तिने त्याचे आभार मानले आणि एकदाची घरी पोहोचली ती.
“किती बरं झालं ना तो भेटला ते, नाहीतर कशी आले असते घरी मी.” मनातल्या मनात स्मिता बोलली, चालून चालून दमलेली स्मिता लगेचच झोपी गेली.
पुढच्या दिवशी हॉस्पिटल मध्ये कामात गढून गेली. संध्याकाळी तेच झालं, उशीर. पुन्हा धावाधाव. पुन्हा बस सुटली. यावेळी कालचा बैलगाडीवालादेखील नव्हता. पायी पायी चालत चालत थोडयावेळाने ती त्या ठिकाणी येऊन पोहोचली. दोन वाटा. कोणती निवडू? वेळ पण खूप झालेला. स्मिता त्याच वाटेने निघाली पुन्हा. कालचीच वेळ. वाट निर्मनुष्य. आभाळात चांदण्या - तारे. बस..! बाकी कोणी नाही. कसलेसे आवाज येत होते. मधेच एक कुत्रा कुठेतरी लांब ओरडायचा. घुबड काळोखातून आवाज करायचा. भीतीदायक वातावरण अगदी. काय करावं सुचेना. पुन्हा ती दिव्याखाली जाऊन उभी राहिली. थोडयावेळाने थंड हवेची झुळूक आली, सोबत मोगऱ्याचा छान सुगंध. लगेच तिने त्या दिशेने पाहिलं. पुन्हा तोच कालचा ओळखीचा चेहरा.
“काय madam, आज पण रस्ता चुकलात वाटते. दुसऱ्या वाटेने जायचे ना घरी.” त्याने येतायेताच सांगितले.
“रस्ता नाही चुकले पण जराशी भीती वाटली म्हणून इकडे उभी राहिले.”
“चला मग. जास्त थांबू नका इथे.” तसे ते दोघे निघाले.
“तुमची काय हीच वेळ आहे का घरी जाण्याची?”
“तसं काही नाही पण बहुतेक याच वेळेस जातो मी घरी.” तिने लगेच घड्याळ बघितलं, संध्याकाळचे ७.३० वाजले होते.
“तुमचं गाव येवढ्या लांब आहे मग एखादी गाडी वगैरे नाही आहे का?”
“नाही आणि गावात कुठे इंधन मिळते गाडीसाठी? त्यापेक्षा चालल्याने व्यायाम सुद्धा होतो ना. मग गाडीची काय गरज?” चालता चालता असे वेगवेगळे विषय निघत होते. वेळ कधी गेला ते कळलच नाही. “चला. तुमची वाट आली समोर. बाय..!” असं म्हणून तो निघून गेला.

आता स्मिताला रोजच उशीर व्हायचा. मुद्दाम नाही. निघायच्या वेळेसच काहीतरी काम यायचं आणि रोज तिला चालतच जावं लागायचं. रोज ती त्या दिव्याखाली थांबायची. मग “तो” यायचा आणि दोघे गप्पा मारत मारत आपापल्या घरी जायचे. असं जवळपास महिनाभर चालू होतं. मधेच ती लवकर घरी गेल्याने त्यांची भेट झाली नव्हती. चांगली ओळख झाली होती त्यांची.
“अगं, हल्ली तू रोज उशिरा जातेस घरी. भीती नाही वाटत का तुला?”, स्मिताच्या हॉस्पिटल मधल्या मैत्रिणीने तिला विचारलं.
“भीती कसली? आणि मला एक मित्र सुद्धा भेटला आहे.”
“कोण गं?”
“अगं त्याचा आणि माझा एकच रस्ता आहे. फक्त माझं गाव आधी येतं. त्याचं जरा पुढे आहे.”
“Ok. नाव काय. विचारलं नाहीस का?”
“हो. सांगते थांब. यश नाव आहे त्याचं. इकडेच पुढे ऑफिस आहे त्याचं. Engineer आहे. तिकडे मोठ्या पोस्टवर आहे.”
“हं... हुशार आहे वाटते.”
“हो. छान आहे दिसायला आणि स्वभाव सुद्धा छान आहे.”
“मी कुठे विचारलं तुला कसा दिसतो ते? प्रेमात पडल्या वाटते madam.”
“चल गं.. काहीतरी काय?” लाजली स्मिता. खरचं तिला आवडायला लागला होता तो. यश सुद्धा तसाच होता, कोणालाही आवडेल असा. स्मिता आता काम नसेल तरीही उशीराच निघायची आणि त्याची वाट पाहत थांबायची. यश येतो आहे हे तिला लांबूनच कळायचे. त्यादिवशी सुद्धा ती उशीराच निघाली. त्याच ठिकाणी येऊन पोहोचली. त्या वाटेकडे जाणार इतक्यात...
“ए बाय, थांब.” असा आवाज आला मागून. मागे बघते तर एक म्हातारी होती.
“काय झालं आजी?” तिने विचारलं,
“अगं बाय, तिकडून कुठं चालली व्हतीस. या इकडनं जा.”
“आजी माझी रोजची वाट आहे ती.”
“गे बाय, नगं जावू तिकडनं. भूत हाय तिकडं.” अस म्हणत ती गेली भरभर निघून. स्मिताही थांबली नाही मग. दिव्याजवळ येऊन यशची वाट बघत राहिली. यश आल्याबरोबर ती त्याच्याबरोबर चालू लागली.
“काय आज गप्प गप्प?” यशने स्मिताला विचारले,
“नाही रे असंच.”
“काहीतरी आहे. मला सांग काय झालं?”
“तुझा भूत, आत्मा यांवर विश्वास आहे का?” तसा यश थांबला.
“वेडीच आहेस गं तू” आणि मोठयाने हसायला लागला.
“हसायला काय झालं तुला?”
“अगं, तू doctor आहेस ना. मी engineer आणि भुतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू म्हणून हसायला आलं मला. पण मधेच कुठे आलं भूत?” यशने स्मिताला विचारलं.
“नाही रे, तिकडे एक म्हातारी भेटली होती. ती बोलली. इकडून जाऊ नकोस. भूत आहे तिकडे.” यशला पुन्हा हसायला आलं.
“वेडी गं वेडी, भूत असतं तर त्याने मलाच पकडलं असतं ना पहिलं कारण तुझ्या अगोदर पासून मी प्रवास करतो इकडून. काही नाही गं. गावातली माणसं जरा अंधश्रद्धाळू असतात. त्यांना काही भास झाला तरी भूत आहे असं म्हणतात. बाकी काही नाही. भूत वगैरे काही नसत. ते त्यांच्या मानण्यावर असतं सगळं.” तशी स्मिता शांत झाली. अचानक कुठूनतरी एक घुबड तिच्या डोक्यावरून उडत गेलं. स्मिताने यशचा हात घट्ट पकडला.
“एक सांगू का तुला?”
“सांग ना.”
“मला एक मराठी गाणं आठवलं लगेच.”
“कोणतं?” स्मिताने विचारलं.
“चांदण्यात फिरताना.. माझा धरलास हात..” आणि यश पुन्हा हसायला लागला.
“गप रे.”
“काय गप्प. आज अमावस्या आहे. वर आभाळात चांदण्या आहेत आणि तू माझा हात पकडला आहेस. मग तेच गाणं आठवणार ना.” तशी स्मिता हसली. बोलता बोलता आपापल्या घरी कधी आले ते कळलंच नाही स्मिताला.

अश्याप्रकारे त्या दोघांची चांगली friendship झाली होती. ६ महिने झाले त्यांच्या friendship ला. स्मिता त्याच्या प्रेमात पडली होती. पण ती यश कधी विचारतो आहे याची वाट पाहत होती. मग तिनेच ठरवलं कि आपल्या आई - वडिलांना यश बद्दल सांगायचे. तसं तिने सांगितलं ही. तिच्या आई - वडिलांना काहीच हरकत नव्हती. यश काही विचारत नाही मग आपणच त्याला विचारूया लग्नाचं, असं तिने ठरवलं. त्यादिवशी ती ठरवूनच गेली हॉस्पिटल मध्ये. संध्याकाळ कधी होते आहे याची वाट पाहू लागली. झाली एकदाची संध्याकाळ आणि निघाली ती यशला भेटायला. थोडयाच वेळात यशही आला.
“तुला एक गोष्ट आज मला सांगावीच लागेल”.
“कोणती गं?”
“तू येण्याअगोदर मोगऱ्याचा छान सुगंध येतो. नक्कीच तो फुलांचा नसावा. कारण एवढया लांबून सुद्धा फुलांचा सुगंध नाही येणार.”
“ते एक सिक्रेट आहे.”
“सांग ना रे.”
“अगं सिक्रेट वगैरे काही नाही. आमच्या गावात कपडे धुण्यासाठी साबण मिळतो ना, त्याचा वास मोगऱ्याचा आहे, इतका strong आहे कि तो सुवास दिवसभर राहतो. त्यामुळे अत्तर लावायची गरजच नाही.” स्मिताने पुढे येउन त्याच्या शर्टचा वास घेतला.
“हो रे, मला पण घेतला पाहिजे तो साबण.”
“चल, पहिलं घरी तर जाऊ.” असं बोलून त्याने चालण्यास सुरुवात केली.
“तुला एक विचारू का यश?”
“विचार ना.”
“लग्न करशील माझ्याशी?” तिच्या प्रश्नाने यश जागीच थांबला.
“बोल ना काहीतरी. उत्तर हवं आहे मला.” स्मिता एकटीच बोलत होती.
“चल, आपल्याला उशीर होतो आहे.”
“थांब ना. उत्तर दे ना मला.”
“काय उत्तर हवं आहे तुला. आपल्याला अजून एकमेकांना समजायला पाहिजे ना. लगेच लग्न कुठे काढलसं तू आणि मी तुला चांगली मैत्रीण मानतो. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं शिवाय माझ्या आणि तुझ्या घरी पण सांगावं लागेल ना.”
“माझ्या घरी सांगितलं आहे मी. तू तुझ्या घरी जाऊन विचार. नाहीतर मी माझ्या पप्पांना बोलावू का बोलणी करायला?”
“नको, थांब जरा. घाई नको. मलाही विचार करू दे जरा.” तोपर्यंत त्याची वाट आली होती.
“चल bye.”
“मला promise कर. उद्या मला उत्तर देशील. नाहीतर मी जाणारच नाही घरी.”
“हो बाबा, तुला उद्या नक्की सांगतो हा. आता घरी जा.” आनंदातच स्मिता घरी पोहोचली.
पूर्ण दिवस ती हवेतच होती. संध्याकाळची वाट पाहत होती ती आणि यशचा होकार कधी ऐकते आहे असं तिला झालं होतं. संध्याकाळी वेळेत पोहोचली ती. यशची वाट बघत उभी होती कधीची. “आज खूप वेळ झाला यशला. रोज ७.३० ला येणारा. ८ वाजले तरी आला नाही”. काम असेल बहुतेक त्याला घड्याळात ९ वाजले तेव्हा ती निघाली. पुढच्या दिवशीही तेच झाले. यश काही आला नाही. असाच आठवडा गेला. यशचा काहीच पत्ता नाही. “कुठे गेलास रे मला सोडून. काय चूक केली मी.” एकटीच बसून स्मिता रडत बसली होती त्याच दिव्याखाली. ५ - १० मिनिटं गेली. थंड हवेची झुळूक आली. पण, मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला. तशीच रडत होती ती. अचानक कुठे गेला यश.