Tuesday, December 20, 2016
Saturday, June 18, 2016
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
'त्याग' केल्याशीवाय 'लाभ' होत नाही. छोटासा त्याग करा भला मोठा लाभ मिळवा.
त्या प्रवाशाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना सुद्धा त्याने बाटलीभर पाण्याचा त्याग केला व भरपूर पाण्याचा लाभ मिळवला.
विश्वास ठेवा, श्रद्धा बाळगा! परिणामांची चिंता अजीबात करू नका. सगळे चांगलेच होईल.
त्या तहानलेल्या प्रवाश्याने चिठ्ठीवर विश्वास ठेवला, श्रद्धा बाळगली. परिणामांची पर्वा न करता त्या चिठ्टीतील सुचनांचे पालन केले. त्याला भरपूर पाणी मिळाले म्हणजेच भरपूर लाभ मिळाला.
या ठिकाणी 'पाणी' याचा अर्थ जिवनातील आनंद असा आहे. आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी की ज्यामुळे आपल्या चेहेर्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य उमटते. कोणाला हे विद्वत्तेमुळे मिळते, कोणाला ते धन संपत्तीमुळे मिळते, कुणाला प्रेमामुळे-कुटुंबामुळे-मित्र मैत्रीणींमुळे मिळते तर कुणाला ईतर कार्णांमूळे मिळते,
पाण्याचा पंप म्हणजे 'कर्माचे' मेकॅनिझम' आहे.
Friday, June 17, 2016
कधी नव्हे ते आई घाई करत होती, पाणी लवकर जातं बाबा लवकर निघतात आईलाही कामला बसायचं असतं त्याच्या आधी केरवारे पुजा पोथी उरकायची असते हे तसं दोघांच्या सवयीचं होतं त्यासाठी मुलांच्या मागे लागायची गरज नव्हती पण तरी आई दोघाना आटपा भराभर आटपा भराभर करत होती
आई काय झालय शेवटी मुलानी विचारलच.. पोह्याची तयारी केली आहेस शेव सुद्धा आणलीस जाऊन
आई म्हणाली काही नाही रे पोरानो माझी एक बालपणीची मैत्रीण येणार आहे मला भेटायला काल तिने तिच्या ड्रायव्हरच्या हाती निरोप धाडला होता
तिच्या समोर वेडेपणा करायचा नाही शाहण्यासारखं वागायचं
आपल्या बारा तेरा वर्षांच्या मुलाना ती आई सांगत होती आहे त्यात आपलं छोटसं घर आवरत होती ठेवणीतली चादर तिने पलंगावर अंथरली... जुनं एक जाजम होतं ते जमिनीवर पसरलं रात्री पलंगावर बाबा झोपत असले तरी दिवसा पाहुणे आले तर त्यांची उठबस पलंगावरच व्हायची पालंगा खालची अडगळ दिसू दिली तर साधे नेहमीचे पाहुणे आणि ती अडगळ लपवायचा प्रयत्न केला तर कोणीतरी खास पाहुणे हे आता मुलानाही माहीत झालं होतं , अत्ता सुद्धा आई ती अडगळ लपवायच्या मागे लागली होती कधी नाही ते तिने स्वैपाकघराच्या दारचा मधला पडदाही खाली सोडला होता पडदा सोडला की मुलाना पडद्याशी खेळायला ऊत यायचाअत्ता ही मुलं सरसावली तशी आईने घाईने अडवलं म्हणाली पाहुणे येऊन जाउदेत मग काय हवं ते खेळा
मुलं म्हणाली आई मैत्रीण म्हणतेस, मग ते पाहुणे कसे?
आई स्वत:शी हसली म्हणाली जो पर्यंत तिला प्रत्यक्ष समोर बघत नाही तो पर्यंत ते पाहुणेच.. भले माझी ती बालपणीची मैत्रीण असेल.. पण आज आम्ही वीस वर्षानी भेटणार आहोत
यावीस वर्षात खूप फरक पडलाय आम्हा दोघीत, स्वत:शी उजळणी करत ती उसंत घेत बसली वैभव वैभव काय म्हणतात ते तिने सुद्धा अनुभवलं होतं
ऐस्पैस बंगला होता नोकर चाकर होते स्वैपाकाला दोन दोन स्वैपाकी होते, पण धाकट्या दिराने दगा दिला आणि दोन महिन्यात होत्याचं नव्हतं झालं परिस्तिथी खालावत खालवत गेली पण ही म्हणायची माझा नवरा माझी मुलं हेच माझं खरं वैभव.. ते जो पर्यंत माझ्यापाशी आहे तो पर्यंत मला काही कमी नाही
मशिबाने दोन्ही मुलं अभ्यासात भलती हुशार होती अभ्यासू होती थोदा वांडपणा करायची पण त्यांच्या वयाचा विचार केला तर ते रास्तच होतं
यजमानांचा गमावलेला काँन्फिडंस हिने हिच्या पाठिंब्याने परत आणला होता
त्यांची नव्याने धडपड हिच्या जिवावर सुरू होती हिचा शिलाईवर फार अल्पकाळात जम बसला होता
दिवस रात्र पाठ आणि मान मोडून ती कामं पूर्ण करत होती त्यात उपास तापास व्रतं वैकल्य सुरूच होती... घरा भोवतीची बाग हा तिचा विरंगुळा होता घरमालकालाही तिच्या या बागेचं कौतूक होतं कोणी आलं तर तिच्या घरा भवतीच्या बागेची दखल घेतल्या शिवाय जात नसत
ती एक्दम भानावर आली ट्रंकेत ठेवलेल्या कप बशा काढायच्या होत्या त्या अशा निमित्तानेच ट्रंकेतून बाहेर यायच्या.. फार जपून वापरल्या जायच्या
आईनी बघितलं तर मुलानी आँलरेडी कप बशा जपून काढून ठेवल्या होत्या तिला मुलांचं भारी कौतूक वाटलं तिला मायेनं त्याना जवळ घ्यायचं होतंपण इतक्यात घराशी गाडी थांबल्याचा आवाज आला, ती बाहेर जाईपर्यंत शोभना तिची मैत्रीण आणि तिची मुलगी योहा गाडीतुन उतरतच होत्या ड्रायव्हरने फळांची करंडी काढली तिला आपले जुने दिवस आठवले दिवाळी दसर्याच्या निमित्ताने अशा डझनावरी करंड्या हिच्या घरून रवाना व्हायच्या... हिने आपल्या मुलाना कधी या श्रीमंतीच्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या फळांची टोकरी बघून मुलं हरखून गेली
शोभनाचं सुप्त समधान झालं ही म्हणाली अगं कशाला आणलस इतकं
शोभना म्हणाली इतक्या वर्षानी भेटतोय रिकाम्या हाताने कसं यायचं हिने लगेच तिची गणना पाहुण्यात करून टाकलीमैत्रीण म्हणून भेटायला येती तर आल्या आल्या गळाभेटी भेटली असती फळाच्या करंडीने हात भरले नसते
.. पाहुण्यात गणना झाल्यावर तिच्याकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीत त्यामुळे त्या दोघीनी बागेकडॆ बघितलं सुद्धा नाही याचं तिला नवल वाटलं नाही एकूण शोभनाचा तोरा बघून मुलानी तिला आँटीची उपाधी देऊन टाकली आणि हिने सुद्धा मावशी म्हणायला सांगितलं नाही जुजबी चौकशी करताना हिच्या दोन्ही मुलाना स्काँलरशीप मिळाल्याचं कळल्यावर शोभनाच्या चेहयावर उसना आनंद जाणवला तिची मुलगी सुद्धा कस्ला तरी महागडा कोर्स करत होती योहा या मुलांपेक्षा मोठी होती पण जरा जास्त मोकळी होती
शोभना ने हिचं गत वैभव आठवून गळा काढायचा प्रयत्न केला पण हिने तो शिताफीने थोपवला.. गप्पा रंगायचा प्रश्नच नव्हता पण संवादही प्रयत्नपुर्वक सुरू ठेवावा लागत होता शोभनाच्या श्रीमंतीचे किस्से ऐकताना मुलं जरा रंगून जात होती ती पण जरुरीपुरतं होला हो करत होती
पण तरी झालं काय जुन्या वाडीतलं घर, चोवीस तास घर व्हरांडा उघडा इतकं भल्या मोठया गाडीतून कोण आलय याची उत्सुकता शेजार्याना होतीच कारण नागवेकर सोडले तर गाडीवाले पाहुणे या घराला माहीत नव्हते... मग या ना त्या बहाण्याने बायकांची ये जा सुरू झाली... तशीही या घरी कोणती गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असं कधीच होत नाही अशी ख्याती होती या घराची बायका हक्कानं मागायला यायच्या अणि हे सढळ हाताने द्यायची
अत्ता सुधा शोभना समोर जठार बाई आली नंदूची आईss जरा दुध मिळेल का हो दोनदा तापवलं तरी दुध नासलच हिने आढे वेढे नं घेता तिने आणलेल्या भांड्यात दुध दिलं मग कोणी विरजण मागायला तर कोणी पिंपातलं एक बादली पाणी मागायला कोणी इस्त्री मागायला तर कोणी शिलाईचे कपडॆ न्यायला येतच राहिलं शोभनाला कळून चुकलं हिची खुपच सामान्य परिस्थिथी झालिये... जाताना मुलांच्या हातात हजार रुपये ठेवायचे तिने ठरवून टाकलं त्या मानाने योहा खूप मोकळी झाली होती तिला हे माणसांचं येणं जाणं खूप आवडलं होतं ती म्हणाली मम्मा आपल्याकडॆ कोणीच असं येत नाही पार्टीला लोक जमतात पण असे येत नाहीत शोभना आपल्या मुलीच्या बोलण्याने सुखवलीच
हिने पोहे करायला घेतले आणि त्याच्या घमघमाटाने तर वातावरणच बदलून गेलं
अमेझींग अमेझींग करत योहा वेडीच झाली आँटी काय करतेस काय करतेस करत ती स्वैपाकघरात शिरली तिच्यामुळे शोभनालाही तिच्या इवल्याशा स्वैपाकघरात शिरता आलं
तिचं स्वैपाकघर ते कसलं त्यातच छोट्टीशी मोरी एक कपाट देव्हारा देव्हार्यातले देव बघून योहा नकळत म्हणून गेली हाऊ प्रिटी आणि इतकी सगळी फ्लावर्स कुठून आणली.. तिला हासायलाच आलं म्हणाली बाहेर बघ ना बाग कशी फुलली आहे
बाग बघायला योहा बाहेर गेली आणि शोभनाला जाणवलं आपण समजत होतो तशी ही बिच्चारी दिसत नाहिये... तिला असुयाच वाटली ऐशोआरामात राहुनसुद्धा आपण मनात दडलेली असुरक्षितता काढून टाकू शकलो नाही
आणि ही बघा कुठल्या कुठे भिरकावली गेली पण नवर्याचा हात घट्ट धरून ती उभी आहे इतकच नाही तर नवर्यालाही तिने ठाम केलय.. ही पोह्याची डीशेश भरत असताना तिघं चौघं आले कोणी वहिनी म्हणतय कोणी ताई कोणी माव्शी म्हणतय आणि हक्काने पोह्यांची मागणी करतय.. आणि ही सुद्धा आनंदाने सागळ्याना बोलावतेय सगळ्यांच्या बशा भरतेय तिला अचानक आपल्या मिसेस वाडेकर या हाकेचा आणि ओळखिचा उब्ग आला
ती भराभर बशा भरत होती नं राहवून ही म्हणाली अगं इअतके पोहे आहेत का?
नाहीतर माझ्यातले कमी कर
ती म्हणाली नाही गं आपल्याकडे जे करायचं ते भरपूरच करावं लागतं मला तीच सवय झालिये.. पोहे न्यायला ही झुंबड उडाली तिच्या बद्दल वाटणारं अगत्य आणि प्रेम प्रत्येकाच्या वागण्यात दिसत होतं शोभनाला आपल्या आयुष्यातला फोलपणा जाणवला तिचं मन तुलना करायला लागलं आणि तिला तिथे बसवेना
पण योहा पूर्ण रमली होती आई मी माव्शीकडे राहयला येणार आहे तिने ऐलान करून टाकलं ही नं राहवून म्हणाली काय वेडी आहेस का? टाँयेलेट्स बाहेर आहेत यांची.. असुदेत तिथे काय मी दिवसभर बसणार नाहिये... सगळे हसले नकळत शोभनालाही हसयला आलं तिला आपण धरून ठेवलेल्या रुबाबाचं ओझं जाणवलं नवर्याच्या नावावर मिळवलेला रुबाब.. आणि इतक्यात मिसेस नागवेकर आल्या
मावशी मावशी म्हणत तिची मुलं त्याना बिलगली त्यानीपण मायेनं त्या दोघाना जवळ घेतलं नागवेकराना बघून शोभना थोडी अवघडली
आणि त्यांचं लक्ष गेलं अरे तुम्ही इथे कशा? मिसेस नागवेकरानी विचारलं
ही म्हणाली तुम्ही ओळखता एकमेकीना?
शोभना वरमल्या स्वरात म्हणाली अगं या बाँस आहेत माझ्या मिस्टरांच्या
पण तुम्ही इथे कशा? शोभना अवघडत म्हणाली
मी नेहमीच येते पण तुम्ही इथे कशा?
ही म्हणाली आम्ही शाळेत दोघी पहिलीपासनं एका वर्गात होतो
अशी काय ओळख करून देतेस? तिला जवळ घेत शोभना म्हणाली ही माझी बालपणीची मैत्रीण आहे जरा हिच्याकडून हिम्मत घ्यायला आले होते
अचानक शोभना मोकळीच झाली म्हणजे अगदी हिच्या शिगडीशी उभं राहून चहाच आधण ठेवण्यापर्यंत
निघताना ती मुलांच्या हातात हजार रुपये ठेवणार होती पण उलट ती मुलाना जवळ घेऊन म्हणाली मला मावशी म्हणायचं आणि तुम्हाला सुट्टी लागली की माझ्याकडे राहयला यायचं ही वेडी ताई आहे ना तिलाही मी पाठवेन तुमच्याकडे निरोप घेताना तिला खरच खूप जड झालं नक्की ये नक्की ये करत ती निघाली
निघताना आवर्जून बागेत शिरली नागवेकर मुलांबरोबर पोहे खात गप्पा मारण्यात रमलेल्या ही या दोघींच्या पाठी होती याची त्याना कल्पना नव्हती
योहा म्हणत होती काय मम्मा रबीश, तू म्हणत होतीस चल तुला पुअर माणसाच घर दाखवते
मावशीचं घर स्माँल आहे पण ती पुअर कुठय?
Saturday, January 30, 2016
घसरत्या तेलदराचं राजकारण (धनंजय बिजले)
अर्थनीतीच्या भूमितीत अडकलेला भारत (संदीप वासलेकर)
Monday, January 25, 2016
Rohit vemmula
रोहित वेमुला यास,
तुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना? तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास? पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास? म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का? इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी!
ज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित! म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना? दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना? मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे? आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार? पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.
हेच होत आले आजवर रोहित! कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना? फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय? अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग! पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित! कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना? अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित! दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी! आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्याला राहिली आहे काय? सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.
हा पुरोगामी बाजार आहे रोहित! इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित! पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित! भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड! फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित! त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल? तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना? मग झेंडे कुठले मिरवायचे? तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग? व्हायचे ते होऊन गेले ना? व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत....
©® भाऊ तोरसेकर