Tuesday, December 20, 2016

Saturday, June 18, 2016

पाण्याची कमाल
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
एकदा एक प्रवासी वाळवंटात हरवला! तो आपली वाट शोधत निघाला. पण लवकरच त्याच्याकडचे पाणी संपले. दोन दिवस झाले पण त्याला काही पाणी मिळाले नाही. पाण्यावाचून त्याची अवस्था अत्यंत सोचनीय अशी झाली. तहानेने तो व्याकुळ झाला. अशीच जर अवस्था राहिली तर आपण काही फार दिवस तग धरू शकत नाही हे त्याच्या ध्यानात आले. आपण मृत्युच्या जवळ पचलो आहोत असे त्याला वाटू लागले. पण पाणी शोधण्याचे प्रयत्न काही त्याने थांबवले नाहीत,
त्याला लांबवर झोपडीसारखे काहीतरी दिसले. आता ती झोपडी होती का नुसताच आभास होता हे काही त्याला कळेना. कारण वाळवंटात असे आभास बरेच होत असतात. पण त्याचा नाईलाज होता. पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून तो झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो झोपडीजवळ पोचला तेव्हा त्याला आढळून आले की ती खरोखरची झोपडी होती, आभास नव्हता. पाण्याच्या आशेने तो झोपडीत घुसला पण त्याची निराशा झाली कारण झोपडीत कुणीच नव्हते. त्या झोपडीतील माणसे ती झोपडी खाली करून गेल्याचे दिसत होते. पण त्या झोपडीत एक पाण्याचा पंप बसवलेला दिसला. त्या पंपाचा एक पाईप खाली जमीनीमध्ये घुसलेला दिसला. कदाचीत खाली विहीर असवी व त्यात पाणी असावे. तो हाताने चालवण्याचा पाण्याचा पंप बघून त्या वटसरूला हायसे वाटले. आता आपल्याला पाणी मिळणार या आशेने त्याने अंगातील सगळी ताकद एकवटून जोरजोरात पंपाचे हँडल चालवायला सुरवात केली. पण ओम फस! पंपातून काही पाणी येईना. जणुकाही खालच्या विहिरीतील पाणी आटले असावे किंवा संपले असावे.
त्या वाटसरूला पुन्हा एकदा निराशेने घेरले पण त्याने आपले प्रयत्न काही सोडले नाहीत. झोपडीत दुसरीकडे कोठे पाणी मिळते का याचा शोध घ्यायला सुरवात केली. बर्याच प्रयत्नानंतर त्याला पाण्याने अख्खी भरलेली बाटली सापडली. त्याला फार आनंद झाला. बाटलीचे बुच उघडून तो घटाघटा पाणी पिणार एवढ्यात त्याचे लक्ष त्या बाटलीला अडकवलेल्या चिठ्टीकडे गेले. त्या चिठ्ठीत लिहीले होते,' कृपया हे पाणी पिऊ नये. हे पाणी हँडपंपात ओतावे म्हणजे तुम्हाला भरपूर पाणी मिळेल. जाताना या बाटलीत पहिल्यासारखे पाणी भरून ठेवावे. धन्यवाद!'
ही चिठ्ठी वाचून काय करावे हे त्या वाटसरुला कळेना. एकीकडे तर प्रचंड तहान लागली होती. पाण्याची नितांत आवश्यकता होती. दुसरीकडे जर हे पाणी पंपात ओतले आणि पाणी नाही आले तर? थोडक्यात हे पाणी पंपात ओतल्यावर त्या पंपातून पाणी येईलच याची शाश्वती नव्हती आणि हे हातचे पाणी पण जाणार होते. काय करावे हे समजत नव्हते.
त्या चिठ्ठीवर विश्वास ठेऊन त्याने ते पाणी पंपात ओतले व पंप सुरू केला. अहो काय आश्चर्य? त्या पंपातून भरपूर पाणी येऊ लागले. त्या प्रवाश्याची तहान तर भागलीच पण त्याला मस्तपैकी आंघोळ पण करता आली. त्याने पुढील प्रवासासाठी भरपूर पाणी भरून घेतले. तिथेच त्याला पेन्सिलने काढलेला एक नकाशा पण दिसला. त्या नकाशात झोपडीचे ठिकाण नक्की कोठे आहे, तसेच सर्वात जवळची मनुष्यवस्ती किती दूर आहे हे दाखवले होते. अर्थात ही मनुष्यवस्ती काही फार जवळ नव्हती पण पण तेथे पोचेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल याची त्याला खात्री पटली होती. आधी आपण कोठे आहोत हेच त्या प्रवाश्याला कळत नव्हते. पण त्या पेन्सिलने काढलेल्या नकाशामूळे आपण कोठे आहोत हे तरी त्याला कळले. त्या चिठ्ठीत लिहील्याप्रमाणे पाण्याची बाटली भरून ठेवली व त्या चिठ्ठीतील मजकुरापुढे स्वतःच्या हाताने मजकूर लिहीला, ' विश्वास ठेवा! हे असे घडते.'
तात्पर्य
'त्याग' केल्याशीवाय 'लाभ' होत नाही. छोटासा त्याग करा भला मोठा लाभ मिळवा.
त्या प्रवाशाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना सुद्धा त्याने बाटलीभर पाण्याचा त्याग केला व भरपूर पाण्याचा लाभ मिळवला.
दुसरी गोष्ट
विश्वास ठेवा, श्रद्धा बाळगा! परिणामांची चिंता अजीबात करू नका. सगळे चांगलेच होईल.
त्या तहानलेल्या प्रवाश्याने चिठ्ठीवर विश्वास ठेवला, श्रद्धा बाळगली. परिणामांची पर्वा न करता त्या चिठ्टीतील सुचनांचे पालन केले. त्याला भरपूर पाणी मिळाले म्हणजेच भरपूर लाभ मिळाला.
या ठिकाणी 'पाणी' याचा अर्थ जिवनातील आनंद असा आहे. आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी की ज्यामुळे आपल्या चेहेर्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य उमटते. कोणाला हे विद्वत्तेमुळे मिळते, कोणाला ते धन संपत्तीमुळे मिळते, कुणाला प्रेमामुळे-कुटुंबामुळे-मित्र मैत्रीणींमुळे मिळते तर कुणाला ईतर कार्णांमूळे मिळते,
पाण्याचा पंप म्हणजे 'कर्माचे' मेकॅनिझम' आहे.
त्याग करा, कर्म करा व लाभ मिळवा असे या गोष्टीचे सांगणे आहे.
अर्थातच असा 'लाभ' मिळवायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
(व्हॉट्सअपच्या सौजन्याने)

Friday, June 17, 2016

कधी नव्हे ते आई घाई करत होती, पाणी लवकर जातं  बाबा लवकर निघतात आईलाही कामला बसायचं असतं त्याच्या आधी केरवारे पुजा पोथी उरकायची असते हे तसं दोघांच्या सवयीचं होतं  त्यासाठी मुलांच्या मागे लागायची गरज नव्हती पण तरी आई दोघाना आटपा भराभर आटपा भराभर करत होती
आई काय झालय शेवटी मुलानी विचारलच.. पोह्याची तयारी केली आहेस शेव सुद्धा आणलीस जाऊन
आई म्हणाली काही नाही रे पोरानो माझी एक बालपणीची मैत्रीण येणार आहे मला भेटायला काल तिने तिच्या ड्रायव्हरच्या  हाती निरोप धाडला होता
तिच्या समोर वेडेपणा करायचा नाही शाहण्यासारखं वागायचं
आपल्या बारा तेरा वर्षांच्या मुलाना ती आई सांगत होती आहे त्यात आपलं छोटसं घर आवरत होती ठेवणीतली चादर तिने पलंगावर अंथरली... जुनं एक जाजम होतं ते जमिनीवर पसरलं  रात्री पलंगावर बाबा झोपत असले तरी दिवसा पाहुणे आले तर त्यांची उठबस पलंगावरच व्हायची पालंगा खालची अडगळ दिसू दिली तर  साधे नेहमीचे पाहुणे आणि ती अडगळ लपवायचा प्रयत्न केला तर कोणीतरी खास पाहुणे हे आता मुलानाही माहीत झालं होतं , अत्ता सुद्धा आई ती अडगळ लपवायच्या मागे लागली होती कधी नाही ते तिने स्वैपाकघराच्या दारचा मधला पडदाही खाली सोडला होता पडदा सोडला की मुलाना पडद्याशी खेळायला ऊत यायचाअत्ता ही मुलं सरसावली तशी आईने घाईने अडवलं म्हणाली पाहुणे येऊन जाउदेत मग काय हवं ते खेळा
मुलं म्हणाली आई मैत्रीण म्हणतेस, मग ते पाहुणे कसे?
आई स्वत:शी हसली म्हणाली जो पर्यंत तिला प्रत्यक्ष  समोर  बघत नाही तो पर्यंत ते पाहुणेच.. भले माझी ती बालपणीची मैत्रीण असेल.. पण आज आम्ही वीस वर्षानी भेटणार आहोत
यावीस वर्षात खूप फरक पडलाय आम्हा दोघीत, स्वत:शी उजळणी करत ती उसंत घेत  बसली वैभव वैभव काय म्हणतात ते तिने सुद्धा अनुभवलं होतं
ऐस्पैस बंगला होता नोकर चाकर होते स्वैपाकाला दोन दोन स्वैपाकी होते, पण धाकट्या दिराने दगा दिला आणि दोन महिन्यात होत्याचं नव्हतं झालं परिस्तिथी खालावत खालवत गेली  पण ही म्हणायची माझा नवरा माझी मुलं हेच माझं खरं वैभव.. ते जो पर्यंत माझ्यापाशी आहे  तो पर्यंत मला काही कमी नाही
मशिबाने दोन्ही मुलं अभ्यासात  भलती हुशार होती अभ्यासू होती थोदा वांडपणा करायची पण त्यांच्या वयाचा विचार केला तर ते रास्तच होतं
यजमानांचा गमावलेला काँन्फिडंस  हिने  हिच्या पाठिंब्याने परत आणला होता
त्यांची नव्याने धडपड हिच्या जिवावर सुरू होती हिचा शिलाईवर फार अल्पकाळात जम बसला होता
दिवस रात्र पाठ आणि मान मोडून ती कामं पूर्ण करत होती त्यात उपास तापास व्रतं वैकल्य सुरूच होती... घरा  भोवतीची बाग हा तिचा विरंगुळा होता घरमालकालाही तिच्या या बागेचं कौतूक होतं  कोणी आलं तर तिच्या घरा भवतीच्या बागेची दखल घेतल्या शिवाय जात नसत
ती एक्दम भानावर आली ट्रंकेत ठेवलेल्या कप बशा काढायच्या होत्या त्या अशा निमित्तानेच ट्रंकेतून बाहेर  यायच्या.. फार  जपून वापरल्या जायच्या
आईनी बघितलं तर मुलानी आँलरेडी कप बशा जपून काढून ठेवल्या होत्या तिला मुलांचं भारी कौतूक वाटलं तिला मायेनं त्याना जवळ घ्यायचं होतंपण इतक्यात घराशी गाडी थांबल्याचा आवाज आला, ती बाहेर जाईपर्यंत शोभना तिची मैत्रीण आणि तिची मुलगी योहा गाडीतुन उतरतच होत्या ड्रायव्हरने फळांची करंडी काढली तिला आपले जुने दिवस आठवले दिवाळी दसर्‍याच्या निमित्ताने अशा डझनावरी करंड्या हिच्या घरून रवाना व्हायच्या... हिने आपल्या मुलाना कधी या श्रीमंतीच्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या फळांची टोकरी बघून मुलं हरखून गेली
शोभनाचं सुप्त समधान झालं ही म्हणाली अगं कशाला आणलस इतकं
शोभना म्हणाली इतक्या वर्षानी भेटतोय रिकाम्या हाताने कसं यायचं  हिने लगेच तिची गणना पाहुण्यात करून टाकलीमैत्रीण म्हणून भेटायला येती तर आल्या आल्या गळाभेटी भेटली असती फळाच्या करंडीने हात भरले नसते
.. पाहुण्यात गणना झाल्यावर तिच्याकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीत त्यामुळे त्या दोघीनी बागेकडॆ बघितलं सुद्धा नाही याचं तिला नवल वाटलं नाही एकूण शोभनाचा तोरा बघून मुलानी तिला आँटीची उपाधी देऊन टाकली आणि हिने सुद्धा मावशी म्हणायला सांगितलं नाही  जुजबी चौकशी करताना हिच्या दोन्ही मुलाना स्काँलरशीप मिळाल्याचं कळल्यावर  शोभनाच्या चेहयावर उसना आनंद जाणवला तिची मुलगी सुद्धा कस्ला तरी महागडा कोर्स करत होती योहा या मुलांपेक्षा मोठी होती पण जरा जास्त मोकळी होती
शोभना ने हिचं गत वैभव आठवून गळा काढायचा प्रयत्न केला पण हिने तो शिताफीने थोपवला.. गप्पा रंगायचा प्रश्नच नव्हता पण संवादही प्रयत्नपुर्वक सुरू ठेवावा लागत होता शोभनाच्या श्रीमंतीचे किस्से ऐकताना मुलं जरा रंगून जात होती ती पण जरुरीपुरतं  होला हो करत होती
पण तरी झालं काय जुन्या वाडीतलं घर, चोवीस तास घर  व्हरांडा उघडा इतकं भल्या मोठया गाडीतून कोण आलय याची उत्सुकता शेजार्याना होतीच कारण नागवेकर सोडले तर गाडीवाले पाहुणे  या घराला माहीत नव्हते... मग या ना त्या बहाण्याने बायकांची ये जा सुरू झाली... तशीही या घरी कोणती गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असं कधीच होत नाही अशी ख्याती होती या घराची बायका हक्कानं मागायला यायच्या अणि हे सढळ हाताने द्यायची
अत्ता सुधा शोभना समोर  जठार बाई आली नंदूची आईss जरा दुध मिळेल का हो दोनदा तापवलं तरी दुध नासलच हिने आढे वेढे नं घेता तिने आणलेल्या  भांड्यात दुध दिलं मग कोणी विरजण मागायला तर कोणी पिंपातलं एक बादली पाणी मागायला कोणी इस्त्री मागायला तर कोणी शिलाईचे कपडॆ न्यायला येतच राहिलं शोभनाला कळून चुकलं हिची खुपच सामान्य परिस्थिथी झालिये... जाताना मुलांच्या हातात हजार रुपये ठेवायचे तिने ठरवून टाकलं त्या  मानाने योहा खूप मोकळी झाली होती तिला हे माणसांचं येणं जाणं खूप आवडलं होतं ती म्हणाली मम्मा आपल्याकडॆ कोणीच असं येत नाही पार्टीला लोक जमतात पण असे येत नाहीत शोभना आपल्या मुलीच्या बोलण्याने सुखवलीच
हिने पोहे करायला घेतले आणि त्याच्या  घमघमाटाने तर वातावरणच बदलून गेलं
अमेझींग अमेझींग करत योहा वेडीच झाली आँटी काय करतेस काय करतेस करत ती स्वैपाकघरात शिरली तिच्यामुळे शोभनालाही तिच्या इवल्याशा स्वैपाकघरात शिरता आलं
तिचं स्वैपाकघर ते कसलं त्यातच छोट्टीशी मोरी एक कपाट देव्हारा देव्हार्यातले देव बघून योहा नकळत म्हणून गेली हाऊ प्रिटी आणि इतकी सगळी फ्लावर्स कुठून आणली.. तिला हासायलाच आलं म्हणाली बाहेर बघ ना बाग कशी फुलली आहे
बाग बघायला योहा बाहेर गेली आणि शोभनाला जाणवलं आपण समजत होतो तशी ही बिच्चारी दिसत नाहिये... तिला असुयाच वाटली ऐशोआरामात राहुनसुद्धा आपण मनात दडलेली असुरक्षितता काढून टाकू शकलो नाही
आणि ही बघा कुठल्या कुठे भिरकावली गेली पण नव‍र्याचा हात घट्ट धरून ती उभी आहे इतकच  नाही तर नवर्‍यालाही  तिने ठाम केलय.. ही पोह्याची डीशेश भरत असताना तिघं  चौघं आले कोणी वहिनी म्हणतय कोणी ताई कोणी माव्शी म्हणतय आणि हक्काने पोह्यांची मागणी करतय.. आणि ही सुद्धा आनंदाने सागळ्याना बोलावतेय सगळ्यांच्या बशा भरतेय तिला अचानक आपल्या मिसेस वाडेकर या हाकेचा आणि ओळखिचा उब्ग आला
ती भराभर बशा भरत होती नं राहवून ही म्हणाली अगं इअतके पोहे आहेत का?
नाहीतर  माझ्यातले  कमी कर
ती म्हणाली नाही गं आपल्याकडे जे करायचं ते भरपूरच करावं लागतं  मला तीच सवय झालिये.. पोहे न्यायला ही झुंबड उडाली तिच्या बद्दल वाटणारं अगत्य आणि प्रेम प्रत्येकाच्या वागण्यात दिसत होतं शोभनाला आपल्या आयुष्यातला फोलपणा जाणवला तिचं मन तुलना करायला लागलं आणि तिला तिथे बसवेना
पण योहा पूर्ण रमली होती आई  मी माव्शीकडे राहयला येणार आहे तिने ऐलान करून टाकलं ही नं राहवून म्हणाली काय वेडी आहेस का? टाँयेलेट्स बाहेर आहेत यांची.. असुदेत तिथे काय मी दिवसभर बसणार  नाहिये... सगळे हसले नकळत शोभनालाही हसयला आलं तिला आपण धरून ठेवलेल्या रुबाबाचं ओझं जाणवलं  नवर्‍याच्या नावावर मिळवलेला रुबाब.. आणि इतक्यात मिसेस नागवेकर आल्या
मावशी मावशी म्हणत तिची मुलं त्याना बिलगली त्यानीपण मायेनं त्या दोघाना जवळ घेतलं  नागवेकराना बघून शोभना थोडी अवघडली
आणि त्यांचं लक्ष गेलं अरे तुम्ही इथे कशा? मिसेस नागवेकरानी विचारलं
ही म्हणाली तुम्ही ओळखता एकमेकीना?
शोभना वरमल्या स्वरात म्हणाली अगं या बाँस आहेत माझ्या मिस्टरांच्या
पण तुम्ही इथे कशा? शोभना अवघडत म्हणाली
मी नेहमीच येते पण तुम्ही इथे कशा?
ही म्हणाली आम्ही शाळेत दोघी पहिलीपासनं एका वर्गात होतो
अशी काय ओळख करून देतेस? तिला जवळ घेत शोभना  म्हणाली ही माझी बालपणीची मैत्रीण आहे जरा हिच्याकडून हिम्मत  घ्यायला आले होते
अचानक शोभना मोकळीच झाली म्हणजे अगदी हिच्या शिगडीशी उभं राहून चहाच आधण ठेवण्यापर्यंत
निघताना  ती मुलांच्या हातात हजार रुपये ठेवणार होती पण उलट ती मुलाना जवळ घेऊन म्हणाली मला मावशी म्हणायचं आणि तुम्हाला सुट्टी लागली की माझ्याकडे राहयला यायचं ही वेडी ताई आहे ना तिलाही मी पाठवेन तुमच्याकडे निरोप घेताना तिला खरच खूप जड झालं   नक्की ये नक्की  ये करत ती निघाली
निघताना आवर्जून बागेत शिरली नागवेकर मुलांबरोबर पोहे खात गप्पा मारण्यात रमलेल्या ही या दोघींच्या पाठी होती याची त्याना कल्पना नव्हती
योहा म्हणत होती काय  मम्मा रबीश, तू म्हणत होतीस चल तुला पुअर माणसाच घर दाखवते
मावशीचं घर स्माँल आहे पण ती पुअर कुठय?

Saturday, January 30, 2016

घसरत्या तेलदराचं राजकारण (धनंजय बिजले)

तेलाचे कोसळणारे दर हा सध्या जागतिक राजकारणातला ज्वलंत मुद्दा ठरतोय. तेलदराच्या या युद्धात आता इराणचं आगमन झाल्यानं सौदी अरेबियापासून ते रशियापर्यंत सारे देश शह- काटशहाचं राजकारण खेळत आहेत. कच्च्या तेलाचे दर आगामी काळात असेच उतरते राहिले तर रशिया, सौदी अरेबिया हे देश तेलामुळं असलेलं त्यांचं जागतिक राजकारणातलं महत्त्वाचं स्थान गमावतील अशी शक्‍यता आहे. 

च्च्या तेलाचे भाव प्रति बॅरलला तीस डॉलरच्या खाली कोसळले आणि जागतिक शेअर बाजारात जणू भूकंपच झाला. शांघायचा शेअर बाजार, न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटपासून ते मुंबईच्या दलाल स्ट्रीटला त्याचे तडाखे जाणवले. २०१४ च्या जूनमध्ये तेलाचा भाव प्रती बॅरल ११५ डॉलर्स होता. तेव्हापासून तो घसरू लागला. तरीही तो शंभर डॉलर्सच्या खाली येणार नाही, असं अनेक तज्ञ त्या वेळी ठामपणे सांगत होते. एक बॅरल तेल उत्पादन करायलाच किमान पन्नास डॉलर लागतात. त्यामुळं त्याच्या खाली तेलाचा दर येणं कोणालाच परवडणारं नाही, असं म्हटलं जात असे. यात काही अंशी तथ्य असलं तरी सध्या तेल पाण्यापेक्षाही स्वस्त मिळू लागलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अवघ्या दीड वर्षात तेलाचे दर एक तृतीयांशनं कोसळले आहेत. याचे भले- बुरे परिणाम साऱ्या जगाला जाणवू लागले आहेत. तेलाची मोठी आयात करावी लागणाऱ्या आपल्या देशासाठी ही चांगली घटना आहे. मात्र तेलाचे भाव कोसळल्यानं तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर डोळेच पांढरे व्हायची वेळ आलीय. तेलावरच ज्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशा आखाती देशांना तसेच रशिया, व्हेनेझ्युएला, नायजेरिया आदी देशांना याचा जबर फटका बसायला लागला आहे. रशियात महागाई शिगेला पोचली आहे तर, व्हेनेझ्युएला, नायजेरियात तेलदरातल्या घसरणीनं सरकारच उलथून टाकलं आहे. तेलाच्या पैशावर पोसल्या गेलेल्या नायजेरियातील बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनेलाही याचा फटका बसणार आहे. 

तेलाचे दर हा जागतिक राजकारणातला ज्वलंत मुद्दा बनला आहे. त्याच्या भोवती सारं राजकारण फेर धरू लागलंय. तेल दराच्या या घातचक्रात आता इराणचं आगमन झाल्यानं सौदी अरेबियापासून ते रशियापर्यंत सारे देश शह- काटशहाचं राजकारण खेळत आहेत. तेलक्षेत्रात निर्माण झालेल्या या परिस्थितीचा कधी भडका उडेल याचा नेम नाही, अशी स्फोटक परिस्थिती आहे. जागतिक सत्तासमतोल बदलविण्याची ताकद तेलामध्ये आहे. त्यामुळं दिवसेंदिवस संघर्षाची धार तीव्र होत जाणार आहे. कच्च्या तेलाचे दर आगामी काळात जर असेच घसरते राहिले तर रशिया, सौदी अरेबिया आपला सारा रुबाब, जागतिक राजकारणातलं त्यांचं महत्त्वाचं स्थान गमावतील अशी शक्‍यता आहे. 

मागणी व पुरवठा या बाजारातल्या सूत्रानुसार तेलाच्या किंमतीत चढउतार होतात. जागतिक अर्थव्यवस्था तेजीत असते तेव्हा तेलाची मागणी वाढते आणि दरही वाढतात. अशा वेळी तेल कंपन्या सर्व शक्तीनिशी तेल उत्पादन करतात. थोडे फार जास्त तेल शिल्लक रहावे हा त्यामागचा हेतू असतो. मात्र जेव्हा जगातच अर्थव्यवस्था धीम्या गतीने चालू लागले त्या वेळी एकूणच उत्पादनावर, क्रयशक्तीवर परिमाण होतो आणि तेलाचे दर घसरू लागतात. याचं बोलकं उदाहरण म्हणून २००८ मधल्या घटनांकडं पाहता येईल. जागतिक बाजारात त्या वेळी अमाप उत्साह होता, घरांची बांधकामं, किंमती वाढत होत्या. एकूणच जागतिक उत्पादन शिगेला पोचलं होते. त्या वेळी तेलाच्या किंमतीही झपाट्यानं वाढल्या. २००८ च्या जुलैमध्ये एका बॅरलचा दर १४३ डॉलर इतका विक्रमी पातळीला गेला होता. मात्र त्याचवर्षी १५ सप्टेंबरला लेहमन ब्रदर्स या अमेरिकेतल्या कंपनीचा डोलारा कोसळला आणि अमेरिकेला मंदीने ग्रासलं. त्याचे परिणाम साऱ्या जगावर व अपरिहार्यपणे तेलाच्या दरावरही झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तेलाच्या एका बॅरलचा दर १४३ डॉलरवरून थेट चक्क ३४ डॉलर्स इतका खाली कोसळला.

तेलाला खऱ्या अर्थानं पुन्हा उभारी दिली ती चीननं. चीनमध्ये पायाभूत सुविधांवर सरकारनं अफाट खर्च सुरू केला. रस्ते, पूल, महामार्ग यांच्या अफाट कामांमुळं तिथल्या अर्थव्यवस्थेनं गती पकडली. त्यातच वाहनांच्या मागणीतही मोठी वाढ झाली. चीनच्या शहरी मध्यमवर्गात चारचाकी व दुचाकी वाहनं विकत घेण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळं २००८ ते २०१३ या पाच वर्षांतच चीनमधली तेलाची मागणी ३५ टक्‍क्‍यांनी वाढली. त्यापाठोपाठ भारत व ब्राझीलसारख्या वेगानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थांमुळं तेलाची मागणी वाढू लागली आणि त्याचे दरही. त्यामुळं तेलानं पुन्हा शंभर डॉलरचा टप्पा सहज गाठला. मात्र ही तेजी अल्पजीवी ठरली. २०१४ च्या प्रारंभी तेलाच्या दरानं घसरणीच्या दिशेनं प्रवास सुरू केला. याची कारणं पुन्हा थोडाफार तशीच होती. दरम्यानच्या काळात कॅनडा व अमेरिकेत तेलाचं उत्पादन अफाट वाढलं होते. २०१० मध्ये दररोज ५५ लाख बॅरल तेल उत्पादन करणाऱ्या अमेरिकेत अवघ्या पाच वर्षांत म्हणजे २०१५ मध्ये मात्र तब्बल ९६ लाख बॅरलचे दररोज उत्पादन होऊ लागलं. कॅनडाची परिस्थितीही अशीच आहे. यात भर पडली ती इराकची. अनेक वर्षं युद्धात होरपळलेल्या इराकमधलं तेल उत्पादन बंदच झालं होते. ते आता सुरू झालं असून तिथंही दररोज वीस लाख बॅरल तेलाचं उत्पादन होत आहे. एका बाजूला तेलाचं उत्पादन अशा रितीनं वाढत असताना मागणी मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. ज्या चीननं तेलाला आधार दिला त्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. चीनचा गेली अनेक वर्षं डोळे दिपवून टाकणारा, दहा टक्के विकासदर एकआकडी झाला. युरोपात मंदी आहेच. अमेरिकेतही फारशी तेजी नाही. एका बाजूला तेलाचं उत्पादन वाढलं पण चीनमधली आणि जागतिक पटलावरची परिस्थिती बदलल्यानं मागणी कमी झाली आणि तेलाचे दर कोसळण्यास सुरवात झाली.

सौदी अरेबियाची खेळी
मागणीप्रमाणं उत्पादन करावं हा साधा सोपा उपाय. म्हणजे सध्या जर तेलाला मागणीच नसेल तर उत्पादन थोडं कमी करावं म्हणजे तोटा होणार नाही असा साधा सोपा मार्ग कोणीही सुचवेल. पण खरी मेख इथेच आहे. सध्या मागणी कमी असूनही तेलाचं उत्पादन बेसुमार सुरू आहे. तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेच्या (ओपेक) बैठकीत तेलाचं उत्पादन कमी न करण्याचा अनाकलनीय निर्णय घेण्यात आला. चार डिसेंबरला हा निर्णय झाला आणि त्याच दिवशी तेलाचे दर पुन्हा पाच टक्‍क्‍यांनी कोसळले. उत्पादन कमी करण्यास सौदी अरेबियाचा कडाडून विरोध आहे. याला कारण म्हणजे सौदीला रशिया व इराणला धडा शिकवायचा आहे. सिरियातील बशीर असाद यांच्या राजवटीला या दोन्ही देशांनी पाठिंबा दिल्यामुळं त्यांना सरळ करण्यासाठी सौदीनं ही खेळी खेळली आहे. समजा ओपेकच्या सदस्यांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तर, मग सौदी अरेबिया तेलाचं उत्पानन वाढवून त्याला शह देईल अशी स्थिती आहे. त्यामुळं सध्या मागणीपेक्षा अफाट तेल उत्पादित होत असून परिणामी भाव कोसळत आहेत. यात भर म्हणून आता इराणचा या बाजारपेठेत प्रवेश होत आहे. अमेरिकेनं इराणशी अणुकरार केल्यामुळं युरोपियन युनियन व अमेरिकेनं त्या देशावरचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळं जागतिक तेलव्यापारास इराण सज्ज झाला आहे. या वर्षअखेरीस इराण दररोज सहा लाख बॅरल तेल निर्माण करेल असं मानलं जातं. सौदी अरेबियाला हे रुचलेलं नाही. त्यामुळं इराणचे स्वागत ‘पडत्या दरानं’ करायचं अशी त्यांची खेळी आहे.  

अशा प्रकारे तेलाचे भाव कमी राहणं अनेक देशांना परवडण्यासारखं नाही. सौदी अरेबियाला हे पुरतं ठावूक आहे. सौदीकडं अफाट परकीय गुंतवणूक व गंगाजळी आहे त्यामुळं हा देश अन्य देशांपेक्षा बराच काळ तग धरू शकतो. त्यामुळं तेलाचे कमी दर ठेवत रशियाला अडचणीत आणायचं असा सौदी अरेबियाचा डाव आहे. रशियात आत्ताच महागाईनं सामान्यांचं कंबरडं मोडलं असून त्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सामान्यांचं यावरून लक्ष वळवण्यासाठीच अध्यक्ष पुतीन यांनी सिरियात सैन्य धाडण्याची खेळी खेळल्याचं राजकीय विश्‍लेषक मानतात. सध्याच्या परिस्थितीत जगात पुन्हा तेलाची मागणी वाढणं हाच या समस्येवरील तोडगा आहे. पण चीनमधली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तिथं नजीकच्या काळात तसं घडण्याची शक्‍यता नाही. ब्राझीलचीही अवस्था बिकटच आहे. जगात सध्या भारताची अर्थव्यवस्था तुलनेनं चांगली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर तेल उत्पादन कमी करणं हा तोडगा आहे. सौदी अरेबिया हे पाउल कधी टाकतेय याकडं जगाचे लक्ष आहे. या मुद्द्यावरून सौदी अरेबिया व इराण या दोन पारंपरिक शत्रूंमधला संघर्ष शिगेला पोचण्याची भीती वर्तविली जात आहे. कदाचित तेलाच्या या संघर्षाचं रूपांतर छोट्या युद्धात होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

तेलउत्पादक देशांना तडाखा
- व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांनी तेलाच्या पैशातून लाखो गरिबांना स्वस्त दरात घरं दिली. २०१३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर नवे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनीही ही योजना सुरू ठेवली, पण तेलाच्या दरातल्या घसरणीमुळं भाव गडगडल्यानं ही योजना अडचणीत आली. महागाई तुफान वाढली. त्यामुळं गेल्या महिन्यात तिथं झालेल्या निवडणुकीत लोकांनी त्यांच्या पक्षाला पराभूत केलं. व्हेनेझुएलातल्या नव्या सरकारनं आता साठ दिवसांची आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे. 
- रशियाला निम्मा महसूल तेलनिर्यातीतून मिळतो. त्यामुळं दर कोसळल्याचा मोठा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. या देशाचं चलन रुबलचा दर डॉलरच्या तुलनेत नीचांकी झाला आहे. सरकारनं अनेक विभागांना खर्च दहा टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे. 
- सौदी अरेबियाला तेलउद्योगातून ७३ टक्के महसूल मिळतो. गेल्या वर्षभरात तेलाचे भाव पडल्यानं सरकारच्या उत्पन्नात २३ टक्के घट झाली आहे. डिसेंबरमध्ये तेथील सरकारनं अत्यंत स्वस्त मिळणाऱ्या पेट्रोलचे दर ४० टक्‍क्‍यांनी वाढविले. अन्य वस्तूंवरील सबसिडी कमी केली आहे. सरकारी कंपन्यांतील वेतनवाढ रोखली आहे. 
- अझरबैजानमध्ये महागाई वाढू लागल्यानं लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. या देशाची सारी भिस्त तेलउद्योगावरच आहे. 
- नायजेरियातदेखील वाढता भ्रष्टाचार व तेलाच्या किंमती कोसळल्याचा फटका अध्यक्ष गुडलक जोनाथन यांना बसला. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभूत व्हावं लागलं असून माजी लष्करशहा मोहंमद बुहारी यांच्याकडं जनतेनं देशाची सूत्रं दिली आहेत.

अर्थनीतीच्या भूमितीत अडकलेला भारत (संदीप वासलेकर)

दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी हे देश उद्‌ध्वस्त झाले होते; परंतु काही वर्षांत ते आर्थिक महासत्ता बनले. हे कसं शक्‍य झालं? तिथल्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेवून अर्थनीतीच्या भूमितीमधल्या नियमांवर लक्ष केंद्रित केलं व तिथल्या उच्चभ्रू समाजानं परिघातल्या स्टेटसचा नाद सोडून आपल्या भोवतालचं वर्तुळ पुसून टाकलं. आपण काय करणार आहोत?

जेव्हा आपण आर्थिक आवाहनांबद्दल चर्चा पाहतो वा ऐकतो, तेव्हा एक विरोधाभास समोर येताना दिसतो. एकीकडं पुण्या-मुंबईत लोक कोट्यवधी रुपये खर्च करून घर घेतात, तर दुसरीकडं शेतकरी आत्महत्या करतात. एकीकडं जगातल्या प्रमुख आर्थिक सत्तांमध्ये भारताचं नाव घेतलं जातं, तर दुसरीकडं अनेक हुशार युवक भारतात भविष्य नसल्यानं परदेशात स्थायिक होण्याची आकांक्षा धरतात. एकीकडं तेलाच्या किमती कमी होऊन महागाई थांबतेय, असं वाटतं, तर दुसरीकडं तेलाच्या किमती कमी झाल्यामुळंच आपली निर्यात कमी होते. जे काही चांगलं होतं, ते आपल्यामुळं व जे काही वाईट होतं ते प्रतिस्पर्धी पक्षामुळं असं प्रत्येक मोठा राजकीय पक्ष मानतो. त्यामागे जनतेला भुरळ पाडून मतांचं अंकगणित असते.

प्रत्यक्षात आपली आर्थिक परिस्थिती अंकगणितात नव्हे; तर भूमितीच्या आकृत्यांमध्ये अडकलेली आहे, यात मध्यभागी आहे त्रिकोण. या त्रिकोणाची एक बाजू गरिबी-श्रीमंती, दुसरी बाजू लोकसंख्या आणि तिसरी बाजू पर्यावरण. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०० कोटी होती. त्यापैकी २० कोटी लोक सुखवस्तू होते. बाकी ८० कोटी लोक गरीब किंवा यथातथाच होते. गेल्या १५ वर्षांत सुमारे २५ कोटी लोकांचं राहणीमान सुधारलं. सध्या ४५ कोटी लोक सुखवस्तू आहेत; परंतु सध्या लोकसंख्यासुद्धा १२५ कोटी आहे. म्हणजे सुखवस्तू लोक दुपटीपेक्षा जास्त वाढूनदेखील ८० कोटी लोक यथातथाच आहेत. जर प्रचंड प्रमाणात उद्योगनिर्मिती करून उत्पन्न वाढवलं व उरलेल्या ८० कोटी लोकांचं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न केला तर झाडं, डोंगर, नद्या, तळी यांची विल्हेवाट लागेल. पावसावर परिणाम होईल. शेतीचं नुकसान होईल व ज्यांचं राहणीमान सुधारलं आहे, ते पुन्हा खाली घसरतील. अशा या त्रिकोणानं आपल्याला ८० कोटींच्या सापळ्यात अडकवलेलं आहे.

गेल्या १५ वर्षांत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व पुन्हा भारतीय जनता पक्ष अशी सरकारं आली. प्रत्येकाच्या कार्यकाळात सापळा तसाच राहिला व सुखवस्तू लोकांची संख्याही वाढत राहिली. हा प्रश्‍न एवढा मूलभूत आहे, की राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देऊन तो सुटणार नाही. त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे.

मात्र, वेगळा व नावीन्यपूर्ण विचार करायचं ठरवलं, तर आपण वर्तुळात सापडतो. जर अर्थनीतीला गती द्यायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. गेल्या १५-२० वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून इन्फोसिस, टीसीएस, विप्रो असे अनेक उद्योगसमूह पुढे आले. अलीकडं फ्लिपकार्टसारख्या कंपन्याही यशस्वी झालेल्या आहेत; परंतु संगणक, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल भारत या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाचं स्वरूप असं आहे, की रोजगारनिर्मिती होत नाही. इन्फोसिस, विप्रो व टीसीएस यांतले एकत्र मिळून फक्त सात लाख लोक काम करतात. संपूर्ण भारतात संगणक व माहिती तंत्रज्ञानसंबंधीच्या क्षेत्रात जेमतेम २०-२५ लाखांचा रोजगार आहे. म्हणजे १२५ कोटींच्या देशात हे क्षेत्र सव्वा कोटी लोकांनादेखील नोकरी देऊ शकणार नाही. असं असलं तरी आपल्याला या क्षेत्रात आगेकूच केलीच पाहिजे; परंतु त्यामुळं आपण ‘तंत्रज्ञानाची गरज व बेरोजगारी व तरीही तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता’ अशा वर्तुळात सापडलो आहोत. हे वर्तुळ आपल्या अर्थनीतीभोवती गेली २० वर्षं फिरत आहे. या काळात आपल्याकडं काँग्रेसनं १० वर्षं, भाजपने आठ वर्षं व तिसऱ्या आघाडीनं दोन वर्षं राज्य केलं. जेव्हा वर्तुळाची चमकदार बाजू समोर दिसते, तेव्हा जो पक्ष सत्तेत असतो, तो श्रेय घेतो. प्रत्यक्षात वर्तुळ फिरतच राहतं!

दुसरं वर्तुळ मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधीचं आहे. सध्या बरेचसे उद्योगसमूह ३०-४० टक्के उत्पादनक्षमता वापरू शकतात. त्यांचं कर्ज खूप मोठं आहे. कर्जाच्या ओझ्याखाली व कारखाने अर्धवट बंद पडलेल्या स्थितीत मोठे उद्योगसमूह सरकारकडं माय-बाप म्हणून पाहतात. सरकार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून उद्योगसमूहांना धंदा देतं; पण हे सर्व सरकारच्या म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या पैशानं होतं. सरकारनं पैसा खर्च केला तर उद्योगसमूहांमध्ये चैतन्य येईल; पण सरकारच्या तिजोरीवरचा भार वाढेल. त्यामुळं कधी ना कधी तरी अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. सरकारनं गुंतवणूक नाही केली तर उद्योगसमूह लिलावात निघतील.

हे वर्तुळ छेदायचं असेल, तर सरकारकडं ग्राहक म्हणून न पाहता जागतिक बाजारपेठ काबीज केली पाहिजे. ते फक्त सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रातल्या कंपन्यांना जमतं. त्यांच्यावर आर्थिक घडी अवलंबून राहिली तर २५ लाखांच्या वर लोकांना नोकरी मिळणं कठीण. असा हा एकमेकांत गुंतलेल्या वर्तुळांचा गुंता सोडवायचा असेल, तर राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देऊन काही तो सुटणार नाही. त्यातून काही उत्तर मिळणार नाही.

यापैकी बरेचसे प्रश्‍न केवळ भारतापुरतेच मर्यादित नाहीत. अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील गेल्या १०-१५ वर्षांत आर्थिक वृद्धी ही तंत्रज्ञानाच्याच साह्यानं झालेली आहे. मात्र, रोजगारात फारशी वाढ झाली नाही. त्यामुळं काही लोक महाश्रीमंत झाले. अनेक युवक गरिबीत ढकलले गेले. हे असंच पुढं सुरू राहील. युरोप, ऑस्ट्रेलिया व विकसनशील देशातदेखील हीच प्रक्रिया दिसते. गेली दोन-तीन वर्षं हाँगकाँगमध्ये युवकांचं आंदोलन सुरू आहे. अलीकडेपर्यंत हाँगकाँग हे एक श्रीमंत बेट म्हणून ओळखलं जाई. तिथं अनेक लोक ऐषआरामात राहतात; पण नव्या पिढीला घर, नोकरी व म्हणून बायकोही मिळणं कठीण झालं आहे. कोरियात युवकांना शहरात जाऊन नोकऱ्या मिळतात; पण मध्यमवयीन मंडळींना नवीन तंत्रज्ञान अवगत नसल्यानं त्यांना बेकार होऊन घरी बसावं लागतं. वृद्धांची परिस्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे. अर्थव्यवस्थेचं स्वरूप संपूर्ण जगभर बदलत चाललं आहे.

जगभरच आर्थिक स्थिती एका भीषण वर्तुळात अडकल्यामुळं भारतातून निर्यात करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे व ती वाढत जाईल. इथं पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला अडवतो. जेव्हा आपण एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोनात उभे असतो, तेव्हा अ-वर्ग+ब-वर्ग= क-वर्ग हे समीकरण जुळतं. म्हणजे आपल्या समोर दिसणारी ‘क’ बाजू आपल्याला जागतिक बाजारपेठेत वाव दाखवते; परंतु ती ‘अ’ व ‘ब’ या बाजूंच्या लांबीवर अवलंबून असते. त्यातली ‘अ’ बाजू म्हणजे आपल्या उद्योगसमूहांची अंतर्गत क्षमता व ‘ब’ बाजू म्हणजे परदेशी ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता. आपले उद्योगसमूह ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी उत्पादनक्षमतेत व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असल्यानं ‘अ’ बाजू तोकडी पडते व तेलाच्या किमती घसरल्यानं बऱ्याच देशांची ऐपत कमी होऊन ‘ब’ बाजू तोकडी पडते. ‘क’ बाजू त्यामुळं मोठी होऊच शकत नाही. यापैकी ‘ब’ बाजू आपल्या हातात नाही. आपण ‘अ’ बाजू कशी वाढवू शकतो, याचा विचार करू शकतो; परंतु तसं करण्याऐवजी आपण परस्परदोषांचं राजकारण करण्यात समाधान मानतो.

आपली अर्थनीती भूमितीत अडकण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपल्या भारतीय उच्चभ्रू समाजाचं मन परिघात अडकलेलं आहे. परिघाच्या बाहेर जग आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे. ‘सप्तरंग’मध्ये उत्तम कांबळे आपल्याला दर रविवारी परिघाबाहेरील लोकांच्या जगण्याची, तिथल्या वास्तवाची आठवण करून देत असतात; परंतु असे प्रयत्न अपवादात्मक होतात व ते स्थानिक भाषांपुरते मर्यादित राहतात. इंग्लिश वर्तमानपत्रं, चर्चा व आपल्या अग्रगण्य अर्थतज्ज्ञांची मतं पाहिल्यावर आपण एका परिघात मानसिकरीत्या अडकलेलो आहोत, हे स्पष्ट दिसतं. दिवसेंदिवस तो परीघ लहान होत चालला आहे, याचं आपल्याला भान राहत नाही.

आपण जरी परिघाबाहेरच्या वास्तवाचा विचार केला नाही, तरी वास्तव हे वास्तवच असतं. जर परिघाबाहेर आग लागली तर परिघाच्या आत असलेले आपण त्या आगीपासून वाचू शकणार नाही. जेवढा परीघ छोटा तेवढा आपल्यावर आगीचा परिणाम लवकर!

अशा परिस्थितीत भारताला आशा आहे का? दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी हे देश उद्‌ध्वस्त झाले होते; परंतु काही वर्षांत ते आर्थिक महासत्ता बनले. हे कसं शक्‍य झालं? तिथल्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेवून अर्थनीतीच्या भूमितीमधल्या नियमांवर लक्ष केंद्रित केलं व तिथल्या उच्चभ्रू समाजानं परिघातल्या स्टेटसचा नाद सोडून आपल्या भोवतालचं वर्तळ पुसून टाकलं. आपण काय करणार?

आपली अर्थनीती भूमितीत अडकण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपल्या भारतीय उच्चभ्रू समाजाचं मन परिघात अडकलेलं आहे. परिघाच्या बाहेर जग आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे. आपण जरी परिघाबाहेरच्या वास्तवाचा विचार केला नाही, तरी वास्तव हे वास्तवच असतं!

Monday, January 25, 2016

Rohit vemmula

रोहित वेमुला यास,

तुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना? तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास? पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास? म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का? इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्‍या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी!

ज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित! म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना? दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना? मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे? आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार? पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्‍या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.

हेच होत आले आजवर रोहित! कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना? फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय? अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्‍यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग! पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित! कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना? अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित! दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी! आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्‍याला राहिली आहे काय? सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.

हा पुरोगामी बाजार आहे रोहित! इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित! पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित! भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड! फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित! त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल? तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना? मग झेंडे कुठले मिरवायचे? तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग? व्हायचे ते होऊन गेले ना? व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत....

©® भाऊ तोरसेकर